मसूर: खेळ म्हटले की हारजीत असतेच हरणार्यांनी जोश व जिंकणार्यांनी विनम्रता सोडू नये सतत आपल्या खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन घडवत तालुक्याचे नाव देशपातळीवर झळकवावे असे प्रतिपादन तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केले.
बेलवाडी (ता.कराड) येथील जय हनुमान करिअर अॅकॅडमीच्या प्रशस्त मैदानावर तालुकास्तरीय शालेय, शासकीय मैदानी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी संयोजक शाळा लाहोटी कन्या प्रशालेच्या प्राचार्या शर्मिला बायस, अॅकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड, सचिव महेश गायकवाड, क्रीडाशिक्षक संभाजी पवार, विभागीय उपाध्यक्ष महेंद्र भोसले, मधुकर सोमासे, आनंदराव जानुगडे, राष्ट्रीय कोच दिलीप चिंचकर, अविनाश कोळी, दिलीप माने, संदिप गायकवाड एन.टी.साळुंखे, शशिकांत शिंदे, हणमंत यादव, पी.टी.पाटील, उमेश नलवडे, प्रदिप बंडगर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्या बायस म्हणाल्या, क्रिडेमुळे शरीराला व मनाला व्यायाम होतो शिवाय त्याच्या जोडीला प्राणायामची जोड दिल्यास सशक्त व सुपरपॉवर भारत निर्माण होवू शकतो. त्यादृष्टीने खेळाडूंनी प्रयत्नशील रहावे.
अॅकॅडमीचे संस्थापक प्रमोद गायकवाड म्हणाले, शरीरसंपदेसाठी आहार व योग्य व्यायाम आवश्यक असून डोक शांत ठेवून शिक्षणही पूर्ण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कठोर परिश्रमामुळेच या संस्थेतून हजारो विद्यार्थी भरती होवून देशसेवा करत आहेत. खिलाडूवत्तीने खेळून खेळाचा दर्जा वाढवावा.
स्वागत स्पर्धा संयोजक महेंद्र भोसले यांनी केले. प्रास्तविक तालुकाध्यक्ष आनंदराव जानुगडे यांनी केले, सुत्रसंचालन दिलीप माने यांनी केले तर सचिव महेश गायकवाड यांनी आभार मानले.
‘खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन घडवत तालुक्याचे नाव देशपातळीवर झळकवा’
RELATED ARTICLES