पाटण:- भाजप आघाडीची केंद्रात व महाराष्ट्रात सत्ता नसताना पाटण तालुक्यात खऱ्या अर्थाने भाजप जिवंत ठेवली. स्वर्गवासी सौ. आयेशा सय्यद (भाभी), रावसाहेब क्षिरसागर आणि त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या बोटावर मोजण्या इतपत कार्यकर्त्यांनी या कार्यकर्त्यांमधे आताचे भाजप पाटण तालुका युवा संघटक व नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस मधे सामील झालेले शिवाजी माने यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर भाजपात आयारामांची भरतीच सुरू झाली. या भरतीत जुन्या कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान मिळत असल्याची भावना शिवाजी माने यांनी पत्रकारांशी बोलून दाखवली. यावेळी शिवाजी माने व त्यांच्या बरोबर राष्ट्रवादीत येणाऱ्या युवकांचा राष्ट्रवादीत नेहमीच मान सन्मान राखला जाईल असे सत्यजितसिंह पाटणकर यांनी सांगितले.
याचवेळी महाराष्ट्रात भाजप – शिवसेनेची युती असलीतरी पाटण मधे शिवसेनेचे उमेदवार शंभुराज देसाई हे कधी भाजपच्या कार्यकर्त्यांना कधी विश्वासात घेतच नाहीत. असे लाचारी पत्करून केवळ यांच्या पाठीमागे राहण्यापेक्षा जिथे मान – सन्मान आहे. तिथे राहणे कधीही चांगले. म्हणूनच मी माझ्या युवा कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे. सद्या सुरू असलेल्या सातारा लोकसभा व पाटण विधानसभा निवडणुकीत श्रीनिवास पाटील आणि सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. असे शिवाजी माने यांनी सांगितले.