पाटण : पाटण तालुक्यात चालुवर्षी जुलै ते नोव्हेंबर अखेर सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे. परतीच्या पावसामुळे शेतीचे पुर्णपणे नुकसान होऊन सर्व प्रकारची पिके वाया गेली आहेत. शेतकरी शासकीय मदतीची वाट पाहत आहेत परंतु पावसाप्रमाणेच शासनाने सुध्दा शेतकर्यांवर अन्यायच केला आहे्.
अद्याप कोणतीही मदत शेतकर्यांना मिळाली नसून काही ठिकाणी फक्त नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत पण प्रत्यक्षात शेतकर्यांच्या हातात काहीच नाही मिळाले त्यामुळे पाटण परिसरातील शेतकरी पुर्णपणे हवालदिल झाला आहे. येत्या आठवड्यात संपूर्ण तालुक्यातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून पंधरा दिवसात नुकसान भरपाई मिळाली पाहिजे व सरसकट कर्ज माफी मिळाली पाहिजे. नाही तर सर्व पक्षीय तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा. पाटणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करताना दिला.
यावेळी पाटण तालुका दूध संघाचे संचालक सुभाषराव पवार, विजय शिंदे, शंकरराव पवार, अभिजीत साळुंखे, शासकीय कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, परतीच्या पावसामुळे शेतजमीन, उभी पिके, शेती पंप यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेली अनके दिवस या परतीच्या पावसामुळे शेतकर्यांचे हाता तोंडाशी आलेली पिके कुजून गेली आहेत. जी काही पिके राहिली आहेत त्यांची काढणी सुरु आहे. परंतु परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. यामुळे उरलेल्या पिकांचेही नुकसान होत आहे. यामुळे शेतकर्यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे. शेतकरी बँकांची कर्जे फेडू शकत नाही.
महाराष्ट्रातील जनता ओल्या दुष्काळात होरपळत असताना हे राज्यकर्ते सत्ता वाटपासाठी भांडत आहेत. शेतकर्यांना सरसकट कर्ज माफी मिळाली पाहिजे. प्राधान्याने शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर या शेतकर्यांना 100% मदत मिळवून देण्यासाठी शासन दरबारी आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. जर शासनाने वेळेत शेतकर्यांना मदत दिली नाही तर वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करु असा इशाराही त्यांनी शासनाला दिला आहे.
पिकांचे झालेले नुकसान पाहण्यासाठी सत्यजितसिंह पाटणकर थेट बांधावर
RELATED ARTICLES