सातारा: अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतीचे व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी वाई तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन शेतकर्यांच्या शेतावर जाऊन बाधित पिकांची पाहणी केली व शेतकर्यांशी नुकसानी विषयी संवाद साधला.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज वाई तालुक्यातील पाचवड, कडेगांव, पसरणी येथील गावातील शेतात जाऊन पिकांची पाहणी केली.
यावेळी वाईच्या प्रांताधिकारी श्रीमती संगिता राजापुरकर, वाईचे तहसिलदार रणजित भोसले, तालुका कृषि अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ, पाचवडचे मंडळ अधिकारी सचिन जाधव, पसरणिचे मंडळ अधिकारी बेलोशे आदी उपस्थित होते.
या अतिवृष्टीमध्ये पाचवड गावातील आले पिक, कडेगांवमधील सोयाबिन पिक तसेच पसरणी गावातील स्ट्रॉबेरी या पिकांचे नुकसान झाले असून या पिकांची जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी पाहणी केली. नुकसान झालेल्या सर्वांना मदत दिली जाईल असेही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी यावेळी सांगितले.
वाई तालुक्यातील अवकाळी पाऊसाने बाधित झालेल्या पिकांची जिल्हाधिकार्यांनी केली पाहणी
RELATED ARTICLES

