म्हसवड : लातूर – सातारा रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आसून ज्या गावा लगतचे काम पूर्ण झाले आहे त्या ठिकाणी दोन्ही साईटला भुयारी गटारे न काढल्याने रस्त्याच्या शेजारील शेतकर्याचे आतोनात नुकसान झाले आहे
याबाबत सविस्तर वृत्त आसे की लातूर – सातारा रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आसून सदर रस्त्याच्या दुतर्फा आसणार्या शेतकर्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे कारण नुकत्याच झालेल्या पावसामुळे बर्याच शेतकर्याच्या शेतात पाऊसाच्या पाण्यामुळे पाणतळी निर्माण झाली आहेत गोंदवले खुर्दयेथील शेतकरी विठ्ठल घाडगे म्हणाले आगोदर दुष्काळाने पिडले व नंतर वरून राज्याच्या कृपेने भरपूर पाऊस झाला परंतू हायवेच्या कामामुळे शेतात पाणतळी निर्माण झाली आहेत कारण रस्त्याचा भराव ऊंच केला आहे व रस्त्याच्या दुतर्फा पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीच ऊपाय योजना ठेकेदारांनी केली नाही त्यामुळे शेतकर्याचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले तेव्हा प्रशासनाने तातडीने शेतांची पहाणी करून पंचनामे करून शेतकर्याना आर्थीक मदत द्यावी व रोडच्या ठेकेदारा कडुन रस्त्याच्या दुतर्फा पाणी वाहून जाण्यासाठी ऊपाययोजना करून घ्यावी व शेतीचे नुकसान टाळावे या वर लवकरात लवकर कार्यवाही व्हावी कारण सद्या शेतात पाणी साठल्याने कोणतेही पिक घेता येत नाही
लातूर-सातारा रस्त्याचे काम संथ गतीने सुरु
RELATED ARTICLES