सातारा : अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची योग्य भरपाई मिळावी, यासाठी शासन जो आदेश देईल, त्यानुसार कार्यवाही होईल. मात्र सातारा जिल्ह्यातील सर्व सरपंचांची शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी असलेल्या लोकभावनेचा आहे.जिल्ह्यात पाणंद रस्त्यांसाठी प्रस्ताव दिला तर तात्काळ निधी उपलब्ध करून दिला जाईल.भविष्यात जिल्ह्याचा अधिक लौकिक वाढविण्यासाठी सरपंचांचे योगदान द्यावे ,असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले.
यावर्षी अवकाळी पावसाने झालेल्या शेतकर्यांच्या नुकसानास हेक्टरी 8 हजाराची मदत जाहीर झाली आहे. ती 25 हजार मिळावी,तसेच जिल्ह्यातील रस्त्यांची दुरावस्ता झाली असून ती कामे व्हावीत,यासाठी जिल्ह्यातील सरपंच परिषदेच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संघटनेच्या पदाधिकार्यांशी जिल्हाधिकार्यांनी मोकळेपणाने चर्चा करताना ग्रामीण भागातील विकास कामे, शेतकर्यांच्या अडचणी, विविध विकास कामांची माहिती घेतली.
सरपंचांच्या अडचणी ऐकून घेऊन त्यांना त्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन आणि समवेत यापुढे ही प्रशासकीय मदत करण्याची ग्वाही दिली. विविध गावच्या सरपंचांनी वेळोवेळी यापुढे प्रशासन आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी एकत्र येऊन जिल्ह्याचा लौकिक वाढविण्यासाठी योगदान देतील ,असे जिल्हाधिकार्यांना सांगितले.
सरपंचांनी जिल्ह्याचा लौकिक वाढविण्यासाठी योगदान द्यावे
RELATED ARTICLES