Thursday, June 26, 2025
Homeठळक घडामोडीयशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्काराचा आज वितरण सोहळा

यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्काराचा आज वितरण सोहळा

कराड : येथील श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने प्रतिवर्षी दिल्या जाणार्‍या यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान सोहळा रविवार, दि.24 नोव्हेंबर रोजी होत आहे. सिक्कीमचे माजी राज्यपाल खा.श्रीनिवास पाटील यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अनंत दीक्षित, रवींद्र बेडकेहाळ उपस्थित राहणार असून इंद्रजीत देशमुख (काकाजी), कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. सौ. वेणूताई चव्हाण स्मारक सभागृहात होणार्‍या या समारंभास परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री कालिका कुटुंबप्रमुख मुनीर बागवान (सावकार), समन्वयक प्रा.अशोक चव्हाण, चेअरमन डॉ. जयवंत सातपुते यांनी केले आहे.
यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी व श्री कालिकादेवी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सुरु केलेल्या या उपक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, रानकवी ना.धो. महानोर, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे, शांतीलाल मुथा व इंद्रजित देशमुख (काकाजी) यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नवास पाटील यांनी प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झाल्यानंतर प्रांताधिकारी ते भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून काम करताना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिप्रेत असणार्‍या महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी मोठे योगदान दिले आहे.
मध्ये त्यांनी प्रशासकीय सेवेतून सेवानिवृत्ती घेऊन शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली कराड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढविली. या मतदारसंघाचे त्यांनी दोनवेळा प्रतिनिधीत्व केले. या कालावधीमध्ये केंद्र सरकारच्या विविध योजना त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
सिक्कीमचे राज्यपाल म्हणूनही त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली आहे.हत्य, कला, क्रीडा, अर्थकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्रातील लोककला, कबड्डी, खो-खो व कुस्ती क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले आहे.
ॠशवंत विचाराने प्रेरित होऊन आयुष्यभर या विचारांची पाठराखण करणार्‍या श्रीनिवास पाटील यांना 2019 मधील सातारा लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा लोकसभेमध्ये प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिप्रेत असणार्‍या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये योगदान देतानाच स्व. चव्हाणसाहेबांच्या विचारांचा जागर करणारे व्यक्तीमत्व म्हणून खा. श्रीनिवास पाटील यांची समाजामध्ये ओळख आहे. त्यांच्या कार्याची नोंद घेऊन हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात सभासद व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री कालिकादेवी पतसंस्थेच्या विश्वस्तांनी केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular