केळघर: शहीद तुकाराम ओंबळे यांच्या अतुलनीय शौर्यामुळेच अतिरेकी अजमल कसाबला जिवंत पकडणे शक्य झाले. शहीद ओंबळे यांच्यासारख्या शहीदांच्या बलिदानामुळेच आपण सुरक्षित असून त्यांचे कार्य समाजाला नेहमी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन युवकांनी देशसेवेत योगदान द्यावे, असे आवाहन तहसिलदार शरद पाटील यांनी केले.
केडंबे (ता.जावली) येथे अशोकचक्र सन्मानित शहीद तुकाराम ओंबळे यांच्या 11 व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित श्रध्दाजंलीपर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी सतीश बुध्दे, मेढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक निळकंठ राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता के.जी.निकम, नियोजन समिती सदस्य एकनाथ ओंबळे, पंचायत समिती सदस्या कांताताई सुतार, सरपंच वैशाली जंगम, उपसरपंच प्रकाश ओंबळे, शिक्षक बँक संचालक शंकरराव जांभळे, मंडलाधिकारी ए.ए.मेमन, आदिनाथ ओंबळे, बंडोपंत ओंबळे, गणपत ओंबळे, नंदकुमार चिकणे, जयवंत कांबळे, अमोल पवार, अमोल गायकवाड, श्री.मगरे, अरविंद सोमवंशी आदिची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी गटविकास अधिकारी सतीश बुध्दे म्हणाले, शहीद ओंबळे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अतिरेक्याला जिवंत पकडला पण त्यांना हौतात्म्य आले. त्यांचे कार्य युवा पिढीला कायम प्रेरणादायी आहे.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. यावेळी नेहरू युवा मंडळ केडंबे, ग्रामस्थ मंडळ, एकनाथ ओंबळे मित्रसमूह, भैरवनाथ गणेशोत्सव मंडळ व बालगणेश मित्र मंडळाचे पदाधिकारी, शालेय विद्यार्थो, महिला उपस्थित होत्या .
दरम्यान तालुक्यातील केळघर, मेढा, कुडाळ, सोमर्डी येथील आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
यावेळी एकनाथ ओंबळे, शिवसेना तालुका प्रमुख विश्वनाथ धनावडे, शिवसेनेचे निमिश शहा, ज्ञानेश्वर गोळे, सचिन शेलार, दिपक पवार, प्रशांत तरडे, रामचंद्र चिकणे, सचिन जवळ, सचिन करंजेकर, बाळासाहेब शिर्के, नामदेव चिकणे, प्रकाश महामुलकर, दत्तात्रय दरेकर यांच्यासह डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. तर रात्री अहमदनगर येथील विशाल गवळी यांचे हुतात्म्याच्या कार्याविषयी व्याख्यान झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेहरू युवा मंडळ, एकनाथ ओंबळे मित्र समूह व ग्रामस्थ मंडळ केडंबे यांनी परिश्रम घेतले.
शहीद ओंबळे यांचे कार्य समाजाला नेहमी प्रेरणादायी: तहसिलदार शरद पाटील
RELATED ARTICLES