सातारा: प्रतापगडावरील शिवप्रतापदिन भव्य प्रमाणात साजरा होण्याबाबत तसेच हा राष्ट्रीय उत्सव व्हावा म्हणून अनेकांची भेट घेतली. पण त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री विनोद तावडे, मंत्री चंद्रकांत पाटील व शिवसेनेच्या नेत्यांनी दुर्लक्ष केले. फडणवीस यांनी भवानीमातेचे आशिर्वाद घेतले असते तर असे घडले नसते, अशी भविष्यवानी शिवप्रतापगड उत्सव समितीचे मिलिंद एकबोटे यांनी केली.
सातारा येथे शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी सांगितले की, आरबी सागरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक करण्यापेक्षा प्रतापगडावर अफझलखान वधाचे पुतळे बसविण्याबाबत संभाजी भिडे यांनी सूचना केली होती त्याकडे दुर्लक्ष केले. भाजपाने हिंदुत्वाची जबाबदारी पार पाडली नाही. त्या चुकीचे त्यांना फळ मिळाले आहे. आता हिंदुनी राजकारणी व प्रशासनाला जाब विचारला पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रतापगडावरील शिवप्रभुंच्या मूर्तीवर हॅलिकॉम्प्टरमधून पुष्पवृष्टी व्हावी, पालकमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनीधींनी या उत्सवाला हजर राहण्याबाबत बंधन असावे, शासकीय मानवंदना देणे, कार्यक्रमाला व्यापक स्वरूप देणे व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम साजरा करून शिवचरित्राचे संस्कार व्हावेत. युवकांना लष्कर भरतीची प्रेरणा मिळावी. या सर्व कार्यक्रमाच्या नियोजनासाठी छत्रपतींचे वंशज उदयनराजे व शिवेंद्रराजे यांनी लक्ष घालावे असेही त्यांनी स्पष्ट केले. मंगळवार दि. 3 डिसेंबर रोजी होणार्या या कार्यक्रमाला सर्व हिंदूंनी उपस्थित रहावे. असे आवाहन मिलिंद एकबोटे, गोविंद गांधी, अॅड.दत्तात्रय सणस यांनी केले.
फडणवीस यांनी भवानी मातेचे आशिर्वाद घेतले असते तर असे घडले नसते : मिलिंद एकबोटे
RELATED ARTICLES