Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीकैलास स्मशान भूमीची अंत्यसंस्काराविषयक नियमावली सादर ; सातारा शहर आणि परिसरातील नागरिकांच्या...

कैलास स्मशान भूमीची अंत्यसंस्काराविषयक नियमावली सादर ; सातारा शहर आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन !

 

सातारा :- सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण हे दिवसेंदिवस वाढत आहेत , अश्या परिस्थितीत सातारा शहर आणि परिसरातील लोकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी कैलास स्मशानभूमीतर्फे अंत्यसंस्कारासाठी येताना काही नियम व अटी ठेवण्यात आल्या आहेत , या नियम व अटींचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष श्री राजेंद्र चोरगे यांनी केले आहे .

अंत्यसंस्कार नियम

सातारा शहर आणि परिसरातील नागरिकांना विनम्र अहवान !

कैलास स्मशान भूमी मध्ये मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करायला आणताना खालील महत्वाच्या अटींचे/नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

नैसर्गिक मृत्यू असेल तर शववाहिनीतुनच मृतदेह आणावा.म्हणजे प्राथमिक नोंद योग्य ठिकाणी होईल.

सिव्हिल किंवा दवाखान्यात मृत्यू झाला असेल तरच मृतदेह दवाखान्यातील मृत्यू चे कारण कळणेसाठी सर्टिफिकेट सह अँबुलन्स मधून मृतदेह आणावा.

मृतव्यक्ती मुंबई , पुणे, अगर पर जिल्हा, तालुका येथे मृत झाली असेल आणि ती व्यक्ती स्थानिक सातारची रहिवाशी असेल ,आणि सदर व्यक्तीचा अंत्यसंस्कार करणेसाठी सातारला आणायचा असेल तर सर्व कायदेशीर पूर्तता केल्या शिवाय कैलास स्मशानभूमीत मृतदेह आनु नये.
,
तसेच अश्या व्यक्ती चा कायदेशीर पूर्तता करून मृतदेह स्मशानभूमीत आणताना त्यांच्या बरोबर अंत्यसंस्कार करणेसाठी आलेली परजिल्ह्यातील व्यक्तीची नोंद शासनाकडे केलीच पाहिजे याची दक्षता घ्यावी.

मृत व्यक्ती अंत्यसंस्कार करणेसाठी आणताना आधार कार्ड किंवा इतर रहिवासी पुरावा (झेरॉक्स)आणि फोटो मृतव्यक्ती आणि त्याची माहिती देणारा यांचा आवश्यक आहे.

परजिल्ह्यातील , तालुक्यातील व्यक्ती सातारला मृत झाली असेल आणि तिचे अंत्यसंस्कार स्मशान भूमी सातारा येथे आणायचे असेल तर त्या मृत व्यक्तीचा अंत्यसंस्कार करणेसाठी प्रशासनाची कायदेशीर मान्यता अंत्यत आवश्यक आहे.

अंत्यसंस्कार करणेसाठी बरोबर येणाऱ्या व्यक्तींची संख्या कमीतकमी 5 व जास्तीतजास्त 10 एवढीच असावी .

अंत्यसंस्कार साठी येणाऱ्या सर्व व्यक्तींनी मास्क घालणे आवश्यक असून, सॅनिटायझर ने किंवा साबणाने हात धुऊन च स्मशान भूमीत प्रवेश करावा. तसेच प्रत्येकात सुरक्षित अंतर ठेवावे.

टीप – रात्री 11 च्या आत च अंत्यसंस्कार केले जातील.
कागोदपत्री पूर्तता आवश्यक च आहे.
चुकीची माहिती देऊन अंत्यसंस्कार केले तर त्याची संपूर्ण जबाबदारी माहिती देणाऱ्या ची राहील.

सध्या कोरोना हा आजार फोफावत आहे आणि त्याचा संसर्ग हा वेगवेगळ्या ठिकाण हुन अंत्यसंस्कार आणि सावडणे विधी साठीयेणाऱ्या लोकांच्या संपर्कामुळे होण्याची जास्त शक्यता असते.

म्हणूनच आपली आणि सातारकरांची काळजी घेणे आपलीच जबाबदारी आहे .

*वरील नियम, अटी या आपल्या आणि सातारकरांच्या सुरक्षतेसाठीच आहेत ,त्या मुळे यासाठी सहकार्य करणे आपले सर्वांचे कर्तव्यच आहे.🙏🏻 स्मशानभूमितील कर्मचार्यांशी सौजन्याने वागावे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कोणाच्याही जवळच्या व्यक्ती च्या अंत्यसंस्कार,सावडणे साठी येत असाल तर त्या अंत्यसंस्कार ला बाहेरचा,परजिल्ह्यातील, तालुक्यातील व्यक्ती आला असलेची माहिती आपणाला कळल्यास प्रशासनाला कळवणे आवश्यकच आहे.

तसदी बद्दल क्षमस्व.
राजेंद्र चोरगे,

श्री बालाजी ट्रस्ट सातारा.

94226 03625, 94236 11111.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular