सातारा दि.: सातारा जिल्ह्यात मुबंई येथून आलेले सात व जळगावातून आलेल्या एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ४० जणांना लागण झाल्याचे एका दिवसात अहवाल आल्याने जिल्हा प्रवेशाचा पुनर्विचार करावा अशी मागणी ग्रामीण भागातून होऊ लागली आहे .
सातारा जिल्ह्यात २४१ बाधित तर १२१ कोरोना मुक्त झाले असले तरी आतापर्यंत सहा जणांचे मृत्यू झाले आहेत. पुणे ,मुंबई, नवी मुंबई,ठाणे जिल्ह्यातील मूळचे सातारकर अधिकृतपणे जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत.त्यांचे ग्रामीण भागात चौदा दिवसांसाठी
विलगीकरण करण्यात येत असले तरी त्यांना फारशी सुविधा नाही. सातारा जिल्हा परिषदेच्या शाळा अनेक ठिकाणी मोडकळीस आलेल्या आहेत. वळवाच्या पावसाने नुकसान होत असताना विलगीकरण झालेले लोक भयभीत झाले असून घरात विलगीकरण करण्यात आलेल्याची परस्थिती बरी आहे.काही ठिकाणी पोल्ट्री फार्म मध्ये विलगीकरण करण्यात आल्याचा तोंडी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याबाबत प्राथमिक चौकशी करण्याची तसदी घेतली जात नाही. संस्थात्मक विलगीकरणला वरिष्ठ अधिकारी भेट देत नाहीत. सर्वत्र कागदी घोडे नाचवले जात आहे. त्यामुळे कोरोना पेक्षाही अधिक भीती गैरसोयीचे वाटू लागली आहे. अशी माहिती पुढे आली आहे.
उत्तर कोरेगावात चोरीछुपे काहींनी गावात प्रवेश करून पुणे गाठले. शिरवळ येथे तपासणी होते. पण, महिन्या भरापूर्वी गावाची वेस बंद करणारे व गाड्या अडवून माघारी पाठविणारे आता कुठे दडून बसले आहेत? असा सवाल जावळी, खंडाळा, पाटण व कराड तालुक्यात विचारण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यातील लोधवडे ता. माण, मुंबई येथून आलेला बाचोली ता कराड , जळगाव येथून उंब्रज , मुंबई येथून आलेला गवेवाडी ता. पाटण , मुंबई येथून बहुलेकरवाडी ता. पाटण , मुंबई येथून कोरेगाव , शिरताव ता. माण , लोधवडे ता. माण पुरुष (मृत), शिरताव ता. माण , कोळकी ता. फलटण , जकातवाडी ता. सातारा , शाहुपूरी ता. सातारा , घारदरे ता. खंडाळा , येळेवाडी ता. खंडाळा य, मुंबई येथून वासोली ता. वाई , मुंबई येथून पिंपोडे ता. कोरेगाव , मुंबई येथून पारगाव खंडाळा , म्हासोली ता. कराड, पाटण येथील निकट सहवासित असे एकूण ४० नागरिकांचा शुक्रवारी रात्री अहवाल पॉझिटिव्ह आला असून मलकापूर ता. कराड येथी पूर्वीच पॉझिटिव्ह दहा दिवसाच्या तपासणी नंतरही पॉझिटिव्ह आला आहे,
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या नागरिकांची संख्या – २४१ झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या१२१ इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या ११४ आहे तर मृत्यु झालेले ६ रुग्ण आहेत. ही संख्या वाढण्याची चिन्ह आहेत. कारण, लोकांना लॉक डाउन नियम पाळणे जिवावर आले असून अनेक जण विनाकारण हिंडत असले तरी त्यांच्यावर अंकुश ठेवणे आवश्यक बाब बनली आहे. दुकाने उघडण्यात आली असली तरी नियमाचे पालन होते की नाही. हे पहाण्याची यंत्रणा पुरेसे नाही. याचा गैरफायदा सातारा शहरातील पोवई नाका येथील काही व्यापारी घेत असून अनेक ठिकाणी वादावादीचे प्रकार घडू लागले आहेत. याची ही जिल्हा प्रशासनाने नोंद घ्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करू लागले आहेत.