सातारा :- सध्या राज्यासह जिल्ह्याची अवस्था खूप बिकट आहे रोज दोन हजारा पेक्षा जास्त लोक बाधित होत आहेत त्यास रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉक डाऊन लावण्यात आले असून त्याची आमलबजावणी रख रखत्या उन्हात आपले पोलीस बांधव करत आहेत
अश्याया या वर्दीतल्या देवमाणसा साठी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा जिल्ह्याचा वतीने एक हजार पाण्याचा बाटल्या आज युवराज पवार जिल्हा अध्यक्ष यांचा हस्ते सातारा शहर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आल्या
सातारा शहरात ठीक ठिकाणी आपले पोलीस बांधव जीवाचा धोका पत्करून आपले कर्तव्य बजावत आहेत चौका चौकात पोलीस या रख रखत्या उन्हात काम करत आहेत अश्या या वर्दीतल्या देवमानसा साठी काय तरी करावे या सामाजिक बांधिलकी मधून जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांचा नेतृत्वाखाली या पोलीस बांधवाना थंड पिण्याचे पाणी मिळावे म्हणून आज एक हजार पाण्याचा बाटल्या
सातारा शहर पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या कडे सुपूर्द करण्यात आल्या
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा आदेशाप्रमाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविले जात असून त्याचा एक भाग म्हणून
आज पोलिसांच्या करिता पाण्याचा बाटल्या देण्यात आल्या
या वेळी मनसे जिल्हाध्य युवराज पवार,वहातुक सेना अध्यक्ष राहुल शेडगे,उपजिल्हा अध्यक्ष अश्विन गोळे,कामगार सेना सरचिटणीस प्रशांत साळुंखे,जेष्ठ मनसे सैनिक प्रशांत बारटक्के, नेचर डीलाईट कम्पनीचे गणेश निकम,जितेंद्र काकडे,जगदीश काकडे,आविष्कार भरगुडे,निखिल पार्टे, राजेंद्र पवार दादा सिंघम,अनिल कांबळे,पोलीस हवालदार राहुल खाडे, आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वर्दीतल्या देव माणसांसाठी 1000 पाण्याचा बाटल्या
RELATED ARTICLES