सातारा :- प्रशासनातील याच अधिकाऱ्यांच्याकडून काम करून घ्यायचे आहे. त्यामुळे आता सूचना दिलेल्या आहेत. प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत, त्यांचे पालन केले नाही तर त्यांची हयगय केली जाणार नसल्याचे सांगत जिल्हा प्रशासनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
सातारा येथे कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आ. मकरंद पाटील, जिल्हाधिकारी शेखरसिंह आदी उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, लसीकरणा संदर्भात काही अडचणी आहेत. फलटण, माण येथे तहसिलदारांना जम्बो कोव्हिडसाठी सूचना दिल्या आहेत. जिल्ह्याला 7 रूग्णवाहिका दिलेल्या आहेत, त्या उद्या मिळतील. रेमडिसिवीरचा इंजेक्शनचा अजिबात तुटवडा नाही. ब्लॅंक, व्हाईट आणि इलो फंगस या आजाराबाबात धोका आहे. फायर आणि आॅक्सिजन आॅडिट करण्याचे आदेश दिलेले आहेत.
जिल्ह्यातील प्रशासनाने दिलेल्या सूचनाचे पालन जिल्हावासीयांनी करावेच लागेल. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणारच त्याबाबत पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत. यापुढे बाहेर फिरणाऱ्याचे टेस्टिंग केले जाणारच आहे. आरोग्य यंत्रणा उत्कृष्ठ काम करत आहे. मात्र जनतेने सहकार्य केले पाहिजे असे अजित पवार यांनी सांगितले.