Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडी.... अन्यथा जिंदगी ना मिलेगी दोबारा हे लक्षात ठेवले पाहिजे

…. अन्यथा जिंदगी ना मिलेगी दोबारा हे लक्षात ठेवले पाहिजे

मेढा ( वार्ताहर ) :-  गेले काही महिने कडक लॉक डाऊनचा चांगला अनुभव घेतल्याने निर्बध उठविताच हुश्श … सुटलो बाबा एकदाच अशी प्रतिक्रिया मेढा आणि परिसरातील नागरीकांकडून व्यक्त होत आहे.
कोरोना काळात उत्पन्न झालेला कोंडमारा नागरीकांना असहाय्य करणारा ठरत होता. त्यातच खायचेवांदे, बाहेर फिरायच वांदे, प्रशासनाचा जरब आणि भिरभिरणारी नजरेबरोबर ऐकू येणारा सायरन आवाजाचा खेळ थांबल्याने आता कोठे हायसे वाटू लागले आहे. या कडक लॉक डाऊन काळात अनेक व्यवसाय ठप्प झाले होते, वाहनांची चाके एका जागेवरच उभी राहिली होती त्यामुळे कर्मचारी वर्ग, कामगारवर्ग, व्यावसायिक यांना “हाती ना काम ना दाम” अशी अवस्था निर्माण होवून विस्कळीतपणा निर्माण झाला होता.
आज प्रशासनाने नागरीकांच्या बाजुने थोडे झुकते माप दिल्याने नागरीकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी याचा गैरफायदा न घेता कायदयात राहूनच जीवन जगावे लागणार आहे याचा विसर पडू देवू नये अन्यथा परत ये रे माझ्या मागल्या अशी अवस्था निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण ?असा प्रश्न निर्माण होवू न देण्याची कामगिरी सर्वाना पार पाडावी लागणार आहे.
या कडक लॉक डाऊन ने नागरिकांना माणुसकी शिकवली असे म्हटले तर वावगे ठरू नये . निसर्गाला साथ दिली तर प्रतिसाद मिळणारच म्हणून नागरीकांनी आता सुज्ञपणाने व जागरूकतेने प्रशासनाने नेमून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे ठरणार आहे अन्यथा ” जिंदगी ना मिलेगी दोबारा ” हे लक्षात ठेवले पाहिजे

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular