Thursday, June 19, 2025
Homeअर्थविश्वतरुणाईला उद्योगशील बनवणारा अवलिया

तरुणाईला उद्योगशील बनवणारा अवलिया

शनिवार दि. ५ आॕगस्टला साताऱ्यात यशवंतराव चव्हाण सभागृहात भव्य उद्योग – रोजगार मेळावा होत आहे. शासन आणि रिपब्लिकन रोजगार आघाडीच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीला उद्योग – व्यवसायाची दिशा देण्याचा प्रयत्न यातून होईल. जिल्हाधिकारी जितेंद्र दुड्डी, रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोकबापू गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत तरुणाईच्या रोजीरोटीचा प्रश्न कसा मिटेल यावर महत्त्वपूर्ण निर्णय होईल. खरेतर असे प्रत्येक जिल्ह्यात उद्योग – रोजगार मेळावे ज्यांच्या नेतृत्वाखाली होत आहेत, त्या चंद्रकांत जगताप यांचीही उपस्थिती यामध्ये आहे ! ”

खटाव तालुक्यातील विसापूरसारख्या खेड्यात वाढलेलं चंद्रकांत जगताप हे साडेआठ अक्षराचे नाव. अष्टपैलू – सदाबहार व्यक्तिमत्व म्हणून अवघा महाराष्ट्र त्यांना ओळखतो. लंडनसारख्या ठिकाणी आपल्या व्यावसायिक कर्तबगारीचा ठसा उमटवून पुन्हा मातृभूमितल्या भूमिपुत्रांच्या हितासाठी पुन्हा महाराष्ट्रात परतले. इथे परतल्यानंतर नवनवीन प्रयोग, उपक्रम यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आंबेडकरी चळवळीचा आणि तरुणाईच्या रोजीरोटीचा मजबूत आधारही बनून राहिले. आज त्यांच्या मार्गदर्शनामुळे आंबेडकरी चळवळीला उद्योगव्यवसायाचा ‘टच’ देणारा महत्वपूर्ण उद्योग – रोजगार मेळावा यशवंतराव चव्हाण सभागृहात होत आहे.

खरं सांगायचे तर महाराष्ट्रात उद्योग – व्यवसायात आजवर अनेक युवक उभे राहिले, प्रस्थापित झाले, पण त्यांनी समाजासाठी पाठीमागे वळून पाहिले नाही. काही अपवाद वगळले तर, ‘आपलीच गाडी, आपलीच माडी अन् आपल्याच बायकोची रंगीबेरंगी साडी या छानछोकी जीवनात ते मश्गूल झाले. ‘चंद्रकांत जगताप मात्र या ‘छानछोकी’ जगण्यात रममान न होता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा स्वावलंबी युवक घडविण्याठी आयुष्य पणाला लावत आहेत. ‘हाताला काम अन् पोटाला भाकर’ हे ब्रीद घेऊन बेरोजगारांना दिलासा देण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य त्यांच्या हातून घडत आहे हे खरोखरच गौरवासहस्पद अन् अभिमानास्पद आहे.

आज सर्वच पातळ्यावर मानवी जीवानाची अवस्था आणि व्यवस्था चिंताजनक अन् असुरक्षित अशा स्वरुपाची बनू पहात आहे. अशा पार्श्व परिस्थितीत ‘रोजीरोटी’ चा महत्वपूर्ण प्रश्न हातात घेऊन महाराष्ट्रातल्या तमाम युवकांना मजबूत हेल्प हँड त्यांनी दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची चळवळ समजून घेऊन नेमकेपणाने पुढे कशी आणि कोणत्या माध्यमातून ‘रन’ करायला हवी याचे अचूक भान ते नव्या तरुणाईला देत आहेत. समाज बदलाच्या प्रक्रियेला गती देताना इश्यू बेस आणि व्हिजनरी भूमिका असणं महत्वाचे आहेच, पण त्याला कृतीची जोड असणं अत्यंत महत्वाचे आहे. नेमक्या याच पध्दतीने कृती करताना चंद्रकांत जगताप सतत अग्रेसर राहिले आहेत. मी ऐकलंय की त्यांनी केवळ तीन दिवसांत तब्बल तीनशे युवकांना जॉब मिळवून दिलाय. खरंतर या एकाच उदाहरणाहून चंद्रकांत जगताप केवळ तडफदारच नव्हे तर जबादार कार्यकर्ता आहात हे सिद्ध झालंय आणि बेरोजगारांसाठी सक्षम ‘कृतिवंत’ नेतृत्वही त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला मिळालंय.

भारतीय समाजाला ज्ञानवंताची, विचारवंताची जेवढी गरज आहे तितकीच किंबहुना त्यापेक्षा थोडीअधिक कृतिवंत व्यक्तीची फार गरज आहे. केवळ ज्ञान, विचार असून उपयोगाचे नाही तर हे जे सर्व काही आहे ते आपण कृतीत उतरवतो की नाही हे खूप आवश्यक आहे. कारण ज्ञानवंत, विचारवंत कृतीकडे वळतातच असे नाही. फारफार तर एखादा इव्हेंट करतील पण मूलभूत स्वरुपाची रोजीरोटीची मुव्हमेंट करतीलच याची काय खात्री ? जिद्द, सातत्य आणि ध्यास त्यांच्याकडे असेलच हे कशावरून ? मुळात समाजबदलासाठीची एक ज्वलंत तेजस निष्ठा, बुलंद असा निर्धार अन् विश्वास असायला हवा. निगेटिव्हिटी गाडून त्याठिकाणी पॉझिटिव्ह काहीतरी उभे करण्याचा संकल्प करुन तरुणाईच्या हातात तसे ‘स्वप्न’ देण्याची जिगर काळजात असायला हवी. तरुणाईला सांगता आले पाहीजे ‘रडू नको, परिस्थितीशी लढ, ‘हटू नको, व्यवस्थेशी झगडा कर. ‘व्यवस्थेनने आजवर उपेक्षितांच्या, वंचितांच्या, शोषितांच्या अनेक पिढ्या गारद केल्या आहेत आता मी गारद होणार नाही तर व्यवस्थेला गारद करेन, ही दमदार उर्जा खेडोपाड्यातल्या, गावागावात, शहराशहरातल्या तरुणाईच्या छाताडात जनरेट करावी लागेल. चंद्रकांत जगताप आज ही ही ऊर्जा जनरेट करत आहेत. सातारा या ऐतिहासिक शहरात विशेषतः आंबेडकरी चळवळीत होत असलेला भव्य उद्योग – रोजगार मेळावा हे त्यांचेच यश होय.

केवळ रोजगाराच्याच नव्हेतर शिक्षण, पब्लिकेशन, नाट्य अशा पातळ्यावरही चंद्रकांत जगताप गरजूंच्या बाहूत बळ भरत आहेत. त्यांच्या या निस्वार्थ धडपडीला, तळमळीला मनःपूर्वक सलाम ! यापुढील चंद्रकांत जगताप यांची सामाजिक, सांस्कृतिक, नाट्य क्षेत्रासह राजकारणातील वाटचाल अधिक दमदार व्हावी. माणसाला माणुसकीचे भान देण्याबरोबरच सामाजिक न्यायाचे कार्य त्यांच्या हातून निरंतर घडत रहावे. यासाठी नवी प्रेरणा, नवी हिम्मत, नवा उत्साह, नवे धैर्य, नवे चैतन्य, नवे साहस, नवा बुलंद निर्धार, नवा विद्रोह, नवा ध्यास आणि नवी जिद्द सतत आपल्या रक्ताच्या थेंबाथेंबातून उत्सर्जित होत राहावो. आपणास उत्तम आरोग्य अन् दीर्घायुष्य लाभो, अशा मनस्वी भावनासह या उद्योग – रोजगार मेळाव्यानिमित्त मनःपूर्वक सदिच्छा !

अरुण विश्वंभर जावळे
९८ २२ ४१ ५४ ७२

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular