साताराः मुंबईतील गिरणी कामगारांची घरासाठी नोंदणी 1 लाख 80 हजारांच्या पुढे गेली आहे. या गिरणी कामगारांना केवळ पांढरी पावती देण्यात आली. यापुढे कोणतीच प्रगती झाली नाही आणि गिरणी कामगारांना घरे अद्याप मिळालेली नाहीत या प्रमुख मागणीसाठी इतर मागण्या करत आज महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्यावतीने सर्व गिरणी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे हातात लाल बावटे घेवून उग्र स्वरूपाची निदर्शने केली. तसेच आपल्या न्याय मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
या मागण्यामध्ये गिरण्यांच्या जागेत गिरणी कामगारांना प्राधान्याने मोफत घरे द्या, सर्व गिरणी कामगारांना घर पात्रतेचा दाखला द्या, याद्यांची छाननी करून बोगस नावे ताबडतोब दूर करा, सर्व गिरणी कामगारांच्या घर बांधणीचा पूर्ण आराखडा जाहीर करा, गिरणी कामगारांच्या मुलांना नोकर्या द्या तसेच गिरणी कामगारांना रेशन व ईएसआय चा लाभ द्या आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यासाठी संपूर्ण जिल्हयातून गिरणी कामगार उपस्थित होते. या निदर्शने व धरणे आंदोलनाचे नेतृत्व कॉ. दिग्वीजय पवार, कॉ. शंकर पाटील, कॉ. विजय निकम यांनी केले होते. गिरणी कामगारांनी आपल्या न्याय मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठविले असून याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.
. (छायाः प्रकाश वायदंडे)
सातार्यात हक्काच्या घरासाठी गिरणी कामगारांची निदर्शने
RELATED ARTICLES