सातारा (अजित जगताप) : शासकीय अधिकारी वगळता सातारा शहरात कार्यालय नसलेल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांसाठी शासकीय विश्रामगृह म्हणजे सासुरवाडी बनली आहे. परंतु, आचारसंहिता मुळे ये कक्ष उघड रे,,,, असा आदेश देण्यार्या कार्यकर्त्यांना ये गपगुमान माघारी जा रे,,असे प्रतिउत्तर मिळू लागले आहे. त्याची चांगलीच चर्चा रंगत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019चा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार शासकीय वाहन, विश्रामगृह,कार्यालय याचा लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना प्रचारासाठी वापर करता येणार नाही.यंदा प्रथमच आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्याची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक अधिकारी तथा सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड,माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी याबाबत सातारा येथे पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली होती.त्यामुळे नेहमी प्रमाणे सातारा शहरातील शासकीय विश्रामगृह येथे काही खासदार, आमदार, वरिष्ठ अधिकारी वगळता राजकीय पक्षांच्या काही पदाधिकारी यांनी या विश्रामगृहाचा वापर स्वत:चे फार्महाऊस असल्यासारखा केला होता. एक नंबर कक्ष वगळता दोन नंबर ते अकरा नंबर कक्ष पर्यंत कार्यकर्त्यांचा राबता होता. उन्हाळ्याची तीव्रता वाढली की, असे कार्यकर्ते पक्षाचे विचार व प्रसार करण्यापेक्षा विश्रामग्रहातील कक्षमध्ये थंडगार वार्याची झुळुक घेण्यात मग्न होते पण, आता त्यांना आचारसंहिता कडक असल्याने चहाची टपरी,हॉटेल, कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन पक्षाचे काम करताना अवघड वाटू लागले आहे. काहींना आता विश्रांती साठी जागा मिळत नसल्याने भाजप-सेना-आर पी आय, रासप, शेतकरी संघटनेचे नेते यांना बुरे दिन आले आहेत.असे वाटू लागले आहे.
सातारा विश्रामगृहातील प्रवेशद्वाराजवळ तीन ठिकाणी आचारसंहिता बाबत फलक लावण्यात आल्याने शासकीय विश्रामगृहात कार्यरत असणार्या कर्मचार्यांचा फुकटचा ताप वाचला आहे. येथील सि सि टी व्ही फुटेजची तपासणी करून दोषींवर कारवाई होऊ शकते याची जाणीव कार्यकर्त्यांना करून देण्यात आली आहे.एरवी पक्षाच्या माध्यमातून बॉसगिरी करणार्या कार्यकर्त्यांना आता त्याच भाषेत उत्तर मिळत असल्याने अनेकांना आचारसंहिता लागू झाल्याची जाणीव झाली आहे.
ये कक्ष उघड रे…गपगुमान माघारी जा रे… चा विश्रामगृहातील संवाद
RELATED ARTICLES