Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीऔंध येथील बागेत सुमारे 300 झाडे जळून खाक ; तीन लाखाचे नुकसान

औंध येथील बागेत सुमारे 300 झाडे जळून खाक ; तीन लाखाचे नुकसान

औंध: औंध येथील हरण्णाप्पा नावाच्या शिवारातील बाग व ड्रिपचे साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत औंध पोलीस स्टेशन व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, येथील रमेश शंकरराव चव्हाण यांची औंध गावच्या पूर्वेस शेती आहे. त्यामधील हरण्णाप्पा नावचे शिवारातील सहा एकर क्षेत्रात बाग लावलेली आहे. यामध्ये त्यांनी आंबा, चिंच,आवळा, चिकू, नारळ, सिताफळ यांची सुमारे साडे पाचशे झाडे लावली आहेत.
यातील सुमारे पावणे तीनशे ते तीनशे झाडे जळून खाक झाली असल्याची माहिती रमेश चव्हाण यांना मिळाली  ते परगावी असल्याने त्यांनी त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांना पाठवून लागलेली आग विझविण्यास सांगितले व झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यास सांगितले. बागेच्या नुकसानीसह ड्रिपपाईपलाईनचे व साहित्याचे मोठे नुकसान झाले असल्याचे घटनास्थळी केलेल्या पाहणीवरुन दिसून आले.  हे सर्व नुकसान तीन लाखाच्या आसपास आहे. याअगोदर ही दोन हजार अकरा साली, दोन हजार चौदा,दोन हजार सतरा साली बागेला अज्ञातांनी लावलेल्या आगीत बागेचे नुकसान झाले होते तसेच मागील वर्षी सुमारे पाच हजार आंबे ही अज्ञातांनी चोरून नेले होते अशी माहिती चव्हाण यांनी दिली. सदर घटनेप्रकरणी अज्ञाताविरोधात रमेश चव्हाण यांनी औध पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
चिकू व चिंचांनी लगडलेली झाडे जळाल्याचे पाहून शेतीचे मालक रमेश चव्हाण यांना अश्रू अनावर झाले वारंवार त्रास देणार्‍या व बागेचे नुकसान करणार्‍यांना कठोर शासन व्हावे अशी मागणी चव्हाण यांनी यावेळी केली आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular