खंडाळा : दादा, माझं नाव उदयनराजे भोसले आहे, उदयनराजे अंबानी किंवा उदयनराजे अडाणी नाही. तो टोल रिलायन्सचा आहे. माझा त्याच्याशी काय संबधं ? तुम्ही सुशिक्षित, सुसंस्कृत आहात. ज्या महाशयांचे तुम्ही कौतुक करता, त्यांनी कालच्या सभेत असंसदीय, अश्लिल वक्तव्य केले. अशा व्यक्तीचे समर्थन तुम्ही कसे करता ? असा खडा सवाल खा.श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी माजी आमदार मदन भोसले यांचे नाव न घेता केला.
पारगाव – खंडाळा व पाचवड येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. पारगाव खंडाळा येथील मयूर मंगल कार्यालयात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यास जननायक आमदार मकरंद पाटील, दत्तानाना ढमाळ, शशिकांत पिसाळ, अॅड. शामराव गाढवे, हणमंत साळुंखे, मनोज पवार, मकरंद मोटे, दिपालीताई साळुंखे, उदयदादा कबुले आदी प्रमुख उपस्थीत होते.
विरोधकांनी प्रचारसभेत खोटे – नाटे आरोप करत चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला . त्याला उदयनराजे भोसले यांनी आज पाचवड व पारगाव खंडाळा येथे सडेतोड उत्तर दिले. विरोधकांच्या वक्तव्याचा समाचार घेतांना उदयनराजे म्हणाले, दादा वयाने मोठे आहेत. ते सातार्यात राहायला असूनही त्यांना माझं नाव माहित नाही याचे आश्चर्य वाटलं ? ते उपस्थित करत असलेल्या टोलचा आणि माझा काय संबंध तो टोल रिलायन्सचा आहे. मी काही अंबानी किंवा अदाणी नाही. दादा तुम्ही सुसंस्कृत आहात. पीळ मारणार्या पैलवानाने पीळ पीळ पीळ करत माथाडी कामगारांना एवढं पिळलं कि तेसुद्धा घाईला आले आहेत . तुम्ही ज्या पक्षात प्रवेश केला आहे, त्या पक्षाने अंबानी, अडाणीसारख्या मूठभर धनदांडग्या उद्योगपतींना देशाची राष्ट्रीय संपत्ती विकली, दादांनी याचा विचार करायला हवा . पीळ मारणार्या पैलवानाकरिता तुम्ही रिंगणात उतरला. एका सभेत असंसदीय व अश्लिल शब्द वापरला. त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, असेही उदयनराजे यावेळी म्हणाले. संसदेत लक्ष घालणे हे टोलनाक्यावर माणसे पाठवण्यासारखे सोपे नसते या त्यांनी केलेल्या टीकेतून त्यांच्या नव्याने गृहप्रवेश केलेल्या पक्षाची ध्येयधोरणे दिसून येतात, असे उदयनराजे म्हणाले.
त्यांची बुद्धी फार काळ टिकणार नाही. निवडणूक आता अंतिम टप्यात आली आहे. त्यांना घरपोच केल्याशिवाय या देशात लोकशाही प्रस्थापित होऊ शकत नाही. हुकूमशाही मुळे देशाचे दुर्दैवाने रशिया सारखे तुकडे होण्यास वेळ लागणार नाही. हे थांबवून आपल्या कुटुंबातील युवक व लहान मुलांच्या भवितव्याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. त्याकरिता योग्य निर्णय घेण्याची हिच वेळ आहे, असेही उदयनराजे म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मनोज पवार, मंगलदास बांदल, प्रमोद शिंदे यांची भाषणे झाली. सभेस राजेंद्र तांबे, दौलतराव साळुंखे, आश्विनीताई पवार, लताताई नरुटे, नंदा गायकवाड, रमेश शिंदे, अजय पायगुडे, राजेंद्र चव्हाण, बंडू ढमाळ, सुनील काटकर, हणमंत शेळके, आर. वाय. जाधव, अॅड. सुभाष घाडगे, अॅड. अंकूश जाधव, एन.डी. क्षीरसागर, अजय भोसले, सिद्धेश्वर राऊत, राजेंद्र मुसळे, अॅड. विकास पवार व पंचक्रोशीतले ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
दरम्यान, पाचवड येथे झालेल्या सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मंगलदास बांदल, प्रतापराव पवार, रजनी भोसले, उदयसिंह पिसाळ, प्रकाश चव्हाण, शारदा ननावरे, अनिल जगताप, रमेश गायकवाड,प्रमोद शिंदे, दिलीप पिसाळ् शशीकांत पवार, महादेव मस्कर, मनिष भंडारे, मदन अप्पा भोसले, मोहनराव जाधव, दिपीप बाबर, लक्ष्मण पिसाळ, शंकर शींदे, सुनिल बाबर, सुरेशराव बाबर, दिपक बाबर, संगीता चव्हाण, प्रकाश पावशे, बाळासाहेब इथापे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थ मोठया प्रमाणावर हजर होते.