सातारा (अतुल देशपांडे यांजकडून) : असून अडचण नसून खोळंबा या म्हणीचा प्रत्येक सध्या सातारा शहरातील विविध बँकांच्या एटीएम कार्ड धारक खातेदारांना भोगावा लागत आहे. करंन्सी विना व्यावहार या प्रनालीव्दारे सरकारी, निमसरकारी, खाजगी तसेच सहकारी बँकांनी सध्या एटीएम कार्ड आपल्या बँक खातेदारांच्यापर्यंत पोहचवली आहेत. त्यामुळे व्यवहारासाठी अनेकजण खीशात पैसे नसतानाही या कार्डव्दारे खरेदीसाठी बाहेर पडतात. मात्र, जुजबी खर्चाला खीशात पैसे हवेत म्हणून हे खातेदार एटीएम मशीन असलेल्या ठिकाणी जातात त्यांना अशरक्ष: बँकींगसेवा राहिली बाजूला मात्र कपाळावर हात मारुन घेण्याची वेळ येत आहे.
उदाहरण घ्यायचे झाले तर सातारा शहरातील राजवाडा परिसरातील अनेक बँकांची एटीएम सेंटर ही केवळ कामाशीवाय नावापुरती राहिली आहेत. यामध्ये बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट, आयडीबीआय, स्टेट बँक यांच्या एटीएममध्ये अनेकदा ग्राहकांना द्यायला पैसे नसतात तर अनेक मशीन इंटरनेट बँकींग सेवेत व्यत्यय आल्यामुळे ती केवळ जागा अडवणारी ठरली आहेत. या मशीनची सेवा बंद आहे, नोटा मशीनमध्ये नाहीत अशा मथळ्याचे फलक या केंद्रावर येणार्या ग्राहकाला बघून अशरक्ष: भिरड येते त्यातच सध्या शैक्षणिक वर्षाच्या कामकाजाला सुरुवात झाल्याने शाळा, कॉलेजची फी वह्या पुस्तकांची खरेदी यादीसाठी पैसा खिशात हवा म्हणून ग्राहक संबंधीत बँकेच्या शाखेत न जाता तो पैसे काढण्यासाठी एटीएम केंद्रावर जातो आणि त्याला हा असा नाहक त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे एकतर संबंधीत बँकांनी या एटीएम केंद्राची व्यवस्था चोख ठेवावी मशीन नादुरुस्त झाल्यास ती त्वरीत दुरुस्त करावीत या मशीनमध्ये करंन्सी नसल्यास ती ताबडतोब भरावी तसेच या केंद्रावर सुरक्षतेच्या दृष्टीने खाजगी सुरक्षारक्षक नेमून व्यवस्थीत बँकींग सेवा ग्राहकांना द्यावी अशी मागणी सामान्य सातारकरांकडून केली जात आहे.
सातारा शहरातील विविध बँकाची एटीएम झाली आहेत शो पीस
RELATED ARTICLES

