औंध : सध्या प्लास्टिक बंदी असूनही येथील श्रीयमाईदेवी यात्रेमध्ये मेवामिठाईची दुकाने तसेच अन्य दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर व्यापारी करत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांच्या सूचनेवरून सहाय्यक गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार यांच्या पथकाने अचानक यात्रेतील दहा मेवामिठाईच्या दुकानांची तपासणी करून वीस किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करून संबंधीत
व्यापार्यांना सुमारे दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. यामध्ये रविवारी सायंकाळी उशीरापर्यंत अनेक दुकानांची तपासणी पथकामार्फत सुरू होती.
यावेळी अनेक दुकानदार, ग्राहकांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले. या कारवाईमध्ये ग्रामविकास अधिकारी चाँदशा काझी,राजगुरू,चिंचकर, प्रमोद कोळी, पिंटु पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. अचानक झालेल्या कारवाईमुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.
औंध यात्रेत प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणार्या व्यापार्यांवर धडक कारवाई; दहा हजार रुपये दंड वसूल
RELATED ARTICLES