मायणी : (सतीश डोंगरे मायणी)चितळी ता.खटाव येथिल जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या खोल्यांची मोठी दुरावस्था झाली आहे.त्यामुळे या शाळेच्या सर्वच्या सर्व (पाच खोल्या) खोल्या संबंधित विभागाने मंजुर करुण बांधकाम त्वरीत सुरु करावे .असे नझाल्यास शाळा बंद व टाळेठोक आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा चितळी ग्रामस्थांचा प्रसिद्धिपत्रका व्दारे दिला आहे.
या बाबत अधिक माहिती चितळी ता खटाव येथे सन १८८५ शाळा सुरु करण्यात आली होती.याशाळेचे बांधकाम १९६२ मध्ये लोकवर्गणीतुन पुर्ण करण्यात आले होते.तत्कालिन सरपंच स्व.भाऊसाहेब पवार यांच्याकाळात जिल्हा परिषदेकडे शाळा वर्गकरण्यात आली तेव्हापासुन दुरुस्ती , देखभाल नाही.
माजी पंचायत समिती सदस्या आनंदी पवार व माजी पंचायत समिती सदस्य विनोद पंडित यांच्या फंडातुन कवले (कौले ) पत्रा घालण्यात आला.मात्र भिंती,फरशी तशीच असल्यामुळे आज भिंती चिरल्या ( तडे गेले)आहेत.बारिक माती मिश्ररीत दगड ,विटा खाली पडत आहेत.तसेच फरशी ही खचली आहे.त्यामुळे या शाळेच्या संपुर्ण खोल्या धोकादायक झाल्या आहेत.तसा दाखलाही बांधकाम विभागाने ९ जानेवारी २०१७ रोजी दिला आहे.सध्या ही शाळा पहिली ते चौथी असुन यामध्ये १०० हुन अधिक विद्यार्थि शिक्षण घेत आहेत.त्यामुळे ही इमारत केव्ही पडु शकते.
सदर पाच खोल्या मिळाव्याम्हणुन जानेवारी २०१७ मध्ये जिल्हा परिषदेच्या मा.शिक्षणाधिकारी साहेबांच्या कार्यालयात अर्ज करण्यात आला आहे.मात्र संबंधित विभागाकडे पाठपुराव्यानंतर सुमारे एका वर्षाने एक खोली मंजुर करण्यात आली आहे.त्यामुळे पंचायत समिती सदस्य हिराचंद पवार, सरपंच साधिका पवार, शाळा समितीच्या अध्यक्षा रेखा पवार यांच्यासह ग्रामस्थांनी पाच खोल्या मंजुर नझाल्यास शाळा बंद व टाळेठोकण्याचा इशारा दिला आहे.