वाई : वाई , खंडाळा,फलटण तालुक्याचे तारणहार असणार्या बलकवडी धरणात 15% पाणी साठा असून पाण्याचा पूर्णपणे खडखडाट झाला आहे. आता फक्त मृत पाण्याचा साठा शिल्लक आहे, त्यामुळे अतिवृष्टी असणार्या वाईच्या पश्चिम भागात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होवून धरण परिसरात पाण्याची भीषणता ऐन मे महिन्यात जाणवणार आहे. या बाबींकडे बलकवडी पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष झाल्याने या खात्याच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित खात्याच्या गलथानपणामुळे अतिवृष्टी असणार्या भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे.
बलकवडी धरण चार टी.एम.सी.चे धरण आहे.वाई,खंडाळा,फलटण,या दुष्काळग्रस्त भागांसाठी या धरणाची उभारणी करण्यात आली आहे.सध्या संपूर्ण राज्याला पाणीटंचाईच्या झळा बसत असून पाणी टंचायीमुळे अख्खा महाराष्ट्र होरपळून निघण्यासारखी परिस्थिती निर्माण प्रशासनाच्या गलथान पणामुळे झाली आहे.बलकवडी धरण अतिवृष्टीच्या परिसरात येत असलेतरी या वर्षी सरासरीच्या प्रमाणात चांगले पर्जन्यमान झाल्याने हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेलेहोते. फलटण तालुक्यात प्रमाणापेक्षा जास्त पाणी सोडल्याने धरण सध्या पूर्ण रिकामे होवून त्यागाची भूमिका घेणार्या भागातच एन उन्हाळ्यात काही किलोमीटर वरून पाणी आणावे लागणार आहे. बलकवडी धरण लवकरच खाली झाल्याने या धरणावर अवलंबून असणार्या पाण्याच्या स्कीम,शेतीच्या पाण्याच्या योजनांचे भवितव्य धोक्यात आले आहे.या धरणाच्या उभारणीत ज्यांनी त्यागाची भूमिका निभावली त्या लोकांच्या नशिबीच पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. ही या भागातील लोकांच्या निष्काळजी पणाचा फटका बसला आहे. बलकवडी पाटबंधारे खात्याच्या गलथान नियोजनामुळे धरणात पाण्याचा थेब शिल्लक राहिला नाही.पिण्याच्या पाण्याच्या स्कीम पूर्ण धोक्यात आल्या आहेत.करोडो रुपये खर्च केलेल्या जललक्ष्मी योजनेचे भवितव्य अडचणीत आले आहे.तरी संबंधित विभागाने या भागातील लोकांच्या त्यागाचा विचार करून पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही, यासाठी उपाय योजना करावी.सध्या उन्हाळ्याची सुट्टी व लग्न सराईमुळे मुंबईकरांचा मोठा राबता राहणार आहे.लग्न कार्यासाठी आलेल्या मुंबईकारचा जीव मेटाकुटीस आला आहे.या भागातील लोकांना मिळालेल्या फलटण तालुक्यातील जमिनी कसण्या योग्य नसल्याने त्या विकून काहीजण कायमचे मुंबईस वास्तव्य करण्यासाठी निघून गेले आहेत.या भागात वस्ती खूप कमी शिल्लक आहे.त्या लोकांना निदान पिण्यासाठी तरी पाणी मिळावे अशी काहीशी लोकांची अपेक्षा आहे.पाटबंधारे खात्याविषयी लोकांच्या भावना आतिशय तीव्र आहेत.गतवर्षी पावसाचे प्रमाण योग्य नसल्याने धरणातील पाण्याचे नियोजन करता आले नाही परंतु शेकडो गावांच्या उदरनिर्वाहासाठी सुरु केलेल्या जललक्ष्मी योजनेसाठी जो प्रचंड खर्च झाला तो पाण्यात जावू नये याची खबरदारी घेवून धरणातील पाण्याचे नियोजन करावे अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
बलकवडी धरणात झाला पाण्याचा खडखडाट; धरणात 15% पाणीसाठा शिल्लक
RELATED ARTICLES