Friday, June 20, 2025
Homeताज्या घडामोडीबारकोड टॅगीगमुळे जनावरांच्या कानांना जखमा

बारकोड टॅगीगमुळे जनावरांच्या कानांना जखमा

म्हसवड ः दुष्काळात राज्यात ठिकठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या चारा छावण्यांतील जनावरांचे दैनंदिन उपस्थितीसाठी टॅगिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत .मात्र जनावरांच्या कानाला टॅगींग करताना मोठ्या प्रमाणात जखमा होत असुन कान फाटले जात आहेत तर रक्तस्त्राव होत असल्याने इन्फेक्शन होऊन मोठ्या जखमा होत आहेत त्यामुळे भिक नको पण कुत्रं आवर अशीच परिस्थिती शेतकर्‍यांची झाली आहे. मुक्या जनावरांच्या वेदना सरकार पंर्यत कोण पोहचवणार हा प्रश्नच आहे ?
केंद्र सरकारच्या पशुसंजीवनी योजनेंतर्गत जनावरांच्या कानांना बारा अंकी नंबरचा टॅग लावून या जनावरांची संपूर्ण माहिती ऑनलाइन अपलोड केली जात आहे. पशुधनासाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या छावण्यांत जनावरांचा चारा व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
दुष्काळी परिस्थिती सुरू केलेल्या छावण्या मध्ये जनावरांची दैनंदिन उपस्थितीची नोंद करण्यासाठी संगणकीय प्रणालीचा आधार घेतला जात आहे.मुळातच जनावरांच्या कानाला पशुधन मोजणी, विमा व कर्ज प्रकरणाचा बिल्ला असे तिन-तिन टॅग असताना आणखी एका टॅगची भर पडली आहे.
मोबाईल वरून चारा छावणी या अ‍ॅप वरून ( कॅटल कॅम्प मॅनेजमेंट सिस्टिम ) विना शुल्क शासनाने उपलब्ध करून दिली आहे .सुरू असलेल्या व नव्याने सुरू होणार्‍यां छावण्या मध्ये ही प्रणाली बंधनकारक करण्यात आली आहे.चारा छावणी अ‍ॅप मध्ये पशुधन व मालकांची नोंदणी करण्यासाठी शेतकर्‍यांचे नाव ,त्याचा 7/12 उतारा,शेतकर्‍यांचे आधार कार्ड ,जनावरे किती व त्यांचे लिंग ,तसेच कानात लावलेले बारकोड स्कॅन करून जनावरांची ऑनलाइन दैनंदिन उपस्थिती घेतली जाणार आहे.
तर दुसरीकडे शासनाने दोन-तिन दिवसात संपुर्ण बारकोडींग पुर्ण करण्याच्या छावणी चालकांना सांगितले असुन बारकोडींग न केल्यास बिले अडकवली जाणार असुन त्याबरोबर गुन्हे दाखल ही केले जाणार आहेत. त्यामुळे सर्वत्र जिल्हातील अन्य तालुक्यातील कर्मचार्‍यांची कुमक मागवून माण तालुक्यातील छावण्यावर टॅगीग केले जात आहे .त्यात काही अनुभव नसल्याले कर्मचारी असल्याने जखमा मोठ्या प्रमाणात होत असुन जनावरे आजारी पडत आहेत.जनावरांचे कान फाटले जात आहेत.
तर काही जनावरांच्या कानातुन रक्तस्त्राव होत असल्याने कानात इन्फेक्शन होत आहे .त्यामुळे सबंधित प्रणालीला शेतकर्‍यांचा विरोध असुन जनावरांच्या वेदना जाणुन ही प्रणाली बंद करण्याची मागणी शेतकर्‍यांमधुन होत आहे .

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular