म्हासुर्णे ः म्हासुर्णे ता.खटाव माण हे दोन्हीही तालुके कायमस्वरुपी दुष्काळी म्हणुन ओळखले जातात.तरीही दुष्काळ व प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन शेतीवर वेगवेगळे प्रयोग राबवुन विक्रमी उत्पादन करणारेही काही शेतकरी मित्र आहे .अशा पैकीच एक आहेत म्हासुर्णे (ता.खटाव) येथील अशोक आनंदा माने व बापुराव आनंदा माने हे दोघेजण भाऊ मिळुन अतिशय चांगल्या प्रकारची शेती मध्ये उत्पन्न काढतात. माने यांची मल्हारपेठ पंढरपूर रस्त्याच्या लगत शेती आहे.या शेतामध्ये पोकराज जातीचा बटाटा लागवड केली असुन या शेतामध्ये त्यांनी बटाट्याच्या लागवड केली आहे पाणी टंचाई असतानाही त्यांनी काटकसरीने पाण्याचा वापर करुन बटाटा चांगला जोपासला.या शेतात बटाट्याचे विक्रमी उत्पादन निघाले अगदी काही बटाटा मानवी चेहर्याच्या आकाराचे तर काही देवाच्या चेहर्याच्या आकाराचे दिसुन येत आहेत तर अंदाजे एका बटाट्याचे वजन एक किलो दोनशे ग्रॅम व एक किलो तिनशे ग्रॅम इतके मोठे वजनाचे बटाटा आढळुन आले.आशा पध्दतीने मोठ्या प्रमाणात विक्रमी उत्पन्न घेवुन सुध्दा बटाट्याच्या मालाला दर नसल्यामुळे शेतकर्यांच्या मनात निराशाच आहे.
पण विक्रमी उत्पन्न निघाले म्हणून कुठे तरी शेतकरी समाधानात दिसत आहे.माने यांनी विक्रमी बटाट्याचे उत्पन्न काढल्यामुळे म्हासुर्णेसह परिसरात माने यांनी विक्रमी उत्पन्न घेतल्याबद्ल चर्चा होत आहे .
म्हासुर्णे येथे एका बटाट्याचे वजन तब्बल सव्वा किलो
RELATED ARTICLES