परळीः भांबवली वजराई धबधबा व भांबवली पुष्प पठारामुळे भांबवली हे गाव अलिकडे प्रकाशझोतात आले आहे. भारतातील नवे पर्यटनाचे दालन म्हणुन भांबवलीकडे पाहिले जाते. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या गावात शासन नवनवीन विकास योजना राबवत असुन, पर्यटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
भांबवलीला पर्यटनाचे मॉडेल बनविण्याचा शासनाचा मानस असताना, विद्युत पुरवठा करणारी डीपी व पोल यांची वाईट दुरावस्था झाली असुन, कोणत्याही क्षणी जमिनदोस्त होण्याच्या मार्गावर आहेत. ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे डीपीला तात्पुरत्या तारेत अडकवुन ठेवली आहे तर पोल ला झाडाच्या आडोशाला टेकु देऊन तात्पुरता उभा ठेवला आहे. भांबवली गाव दुर्गम डोंगरात वसलेले असुन सुसाट वारा व मुसळदार पाऊस हे येथील वैशिष्ट्य. तसेच सर्व प्रकारचे रानटी जनावरे तसेच पाळीव प्राणी वसतीला आहेत. पोल व डीपी शाळेच्या आवारात असल्याने, जीवीत हानी होण्याचा धोका संभवतो. पर्यटकांसाठी पार्किंगची सोय याच परिसरात केली असुन उघड्या डीपीमुळे पर्यटकांचा अपघात संभवतो. दोन वर्षांपासुन महाराष्ट्र विद्युत महामंडळाला, परळी युनिट, सातारा यांना कळवुनहि काहीही उपाय योजना केल्या गेल्या नाहीत. डीपी व पोल कोसळण्याची शक्यता आहे तसेच जनावरे चरताना व शाळेतील मुले खेळताना अपघात घडण्याची शक्यता आहे, त्यामुळे संभावित अपघाताची पुर्ण जबाबदारी विद्युत महामंडळाची राहणार आहे. तसेच यावर लवकरच तोडगा काढण्यात यावा अशी मागणी स्थानिक करत आहेत.
भांबवलीत विद्युत डीपी व पोल धोकादायक
RELATED ARTICLES