म्हासुर्णे (प्रतिनिधी तुषार माने ) :- महाराष्ट्रातील दुर्गस्वच्छतेत अग्रेसर असनारी नोंदणीकृत नामांकीत संस्था “राजाशिवछत्रपती परिवार,महाराष्ट्र” यांचेमार्फत सातारा जिल्हयातील किल्ले भूषनगड येथे दि.०९/०९/२०१८ रोजी दुर्गस्वच्छता व जनजागृती मोहीम राबवण्यात आली.या परिवारामार्फत अखंड महाराष्ट्रातील २१ जिल्हयातून दुर्गस्वच्छता व जनजागृतीचे शिवकार्य केले जाते.परिवाराच्या सांगली व सातारा विभागाच्या मावळयांनी मिळून संयुक्तरित्या ही मोहीम पार पाडली. यावेळी गडावरील काटेरी झाडेझुडपे काढण्यात आली तसेच गडावरील पाऊलवाट मोकळी करून गडावरील आणी हरणाई मंदीर परिसरातील प्लॅस्टीक व इतर घनकचरा गोळा करून गडाच्या पायथ्याशी एकत्र करण्यात आला मोहीमेदरम्यान दुर्गसंवर्धनाबाबत प्रबोधन करण्यात आले.म्हासूर्णे ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच श्री सुहास माने,माजी उपसरपंच श्री अजीत माने,श्री शरद माने,श्री लक्ष्मण माने श्रीधर माने यांनी शिवप्रतीमा देवून परिवारातील मावळ्यांचा सत्कार केला.या स्वच्छता मोहीमेस श्री विकास सरनोबत व प्राध्यापक ज्ञानेश्वर माने(माऊली)यांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी सांगली व सातारा विभागातील मावळे मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
राजाशिवछत्रपती परिवाराकडुन किल्ले भुषणगडची स्वच्छता
RELATED ARTICLES