सातारा (अजित जगताप) : राजकारणामध्ये वैचारिक बैठक असणारा कार्यकर्ता हा राजकीय पक्षाचा कणा असतो. त्याच्या आधारावरच सत्ता मिळवता येते. याचा अनुभव देशाने घेतलेला आहे. परंतू अलिकडच्या काळात वैचारिक बैठक खुंटीला अडकवून पायातील पायताण बदलावे अशापद्धतीने राष्ट्रीय पक्ष बदलणार्या रेडीमेड कार्यकर्त्यांमुळे सध्या अनेक पक्षाला अडचणी येत आहे. सत्तर वर्षाचीसत्ता हातातून गेल्यानंतर अनेकजण आता भाजपवासी होत आहेत. काँग्रेसयुक्त भाजपमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप निष्ठावंतांना कोंडमारा सहन करावा लागत आहे. याची आता उघड चर्चा होऊ लागलेली आहे.
ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती केली आहे. त्याला आता वीस वर्ष झाली आहेत. पण याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अनेकजण बाहेर पडले आहेत. काहीजण भाजपमध्ये जाऊन मंत्री झालेले आहेत. काँग्रेस पक्षाच्या विरोधीपक्ष नेत्यानेच हाताच्या पंजात कमळ धरल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पूर्वी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणारे हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन या चळवळीचा इतिहास निर्माण केला. त्याच आधारे दलित पँथर चळवळीच्या माध्यमातून दलित साहित्यिक उभे राहिले. जनसंघाच्या माध्यमातून भाजपची कळी उमलली. तसेच बजाओ पुंगी हटाओ लुँगी हा नारा देऊन प्रबोधनकार ठाकरे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. वैचारिक मतभेद असले तरी चळवळीच्या माध्यमातून एकत्रित काम केले. पण एकमेकांच्या पक्षात प्रवेश करण्याचे धाडस कुणी केले नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास होता. पण आज सत्तेचा वाटा विनाकष्ट मिळावे यासाठी आता जूना विचार मोडीत काढून नवा विचार प्रवाह आपल्या अंगी उतरवण्यासाठी रेडिमेड कार्यकर्ते निर्माण होऊ लागलेले आहेत. ज्यांच्या तीन पिढ्या पक्षाच्या कामगिरीवर सत्तेत लोळत होत्या. अशी अनेक राजकीय घराणी सध्या भाजपसमोर लोटांगण घेऊ लागलेली आहेत. अकलूजचे मोहिते पाटील, नगरचे विखेपाटील, ही ताजी उदाहरणे आहेत. त्याचबरोबर अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले काँग्रेस-राष्ट्रवादीतील काही मातबरांनी घरघर मोदी पोहोचवून सत्तेच्या खेळात आपली सोंगटी ङ्गिट बसवल्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मुळातच पिपाणी कितीजरी ङ्गुकली तरी तिचा आवाज हा तुतारी इतकाही होत नाही. याचेही काहींना भान राहिले नाही.
सध्या काँग्रेस पक्षाचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजप प्रवेशासाठी त्यांच्यासमवेत अब्दूल सत्तार यांनीही प्रयत्न सुरू केले आहेत. सातारा जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी मधील प्रमुख नेत्यांमध्ये गणना झालेले माजी आमदार मदने भोसले, डॉ. अतूल भोसले, महेश शिंदे, अमित कदम, मनोज घोरपडे, नरेंद्र पाटील, डॉ. दिलीप बेळगावकर, अनिल देसाई यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश झालेला आहे. प्रवेश हा भविष्यातील मूळच्या भाजपनेत्यांवर अन्यायकारक ठरू नये अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. सध्या शिवसेनेपेक्षा भाजपचे पारडे जड वाटत असले तरी लोकसभेचा निकष व विधानसभेची जुगलबंदी यांचेमध्ये खूप मोठे अंतर आहे. त्यामुळे काँग्रेस – राष्ट्रवादी पक्षातील काहींना भाजप सेनेमध्ये जाऊन सत्तेचा गोळा आपल्या घशात घालण्यासाठी पक्ष प्रवेशाचे झूल पांघरले आहे. हे आता लपून राहिलेले नाही. या प्रक्रियेमध्ये जनसंघाच्या माध्यमातून खेड्यापाड्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाऊन हिंदूत्वाचे धडे गिरवणारे स्वयंसेवक आज नेतृत्वापासून लांब राहिलेले आहेत. याची खंत संघ व भाजपचे कार्यकर्ते उघड उघड बोलू लागलेले आहेत. एखाद्या शेतीची मशागत करून भरघोस पिक काढणार्या शेतकर्यांच्या हातात काहीच लागत नाही. तशी अवस्था संघ व भाजपची झाली आहे. तर दुसर्या बाजूला विना कष्ट काँग्रेस व राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या रेडिमेड कार्यकर्त्यांना सत्तेची ऊब मिळत असल्यामुळे त्यांच्याकडे आता आशाळभूतपणे पाहणार्यांची संख्या वाढू लागलेली आहे. एक वेळी स्वाभिमानाची भाषा करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटने सदाभाऊ खोत हे भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार झाले आहेत. तर कवी मनाचे नेते रामदास आठवले यांनी आर.पी.आय. ही ङ्गक्त भाजपच्या मंडपातील झालर समजून त्याचा वापर करण्यास मुभा दिली आहे. असे आता तळागाळातील कार्यकर्त्यांना वाटू लागले आहे. एकूणच काँग्रेसयुक्त भाजपमुळे ङ्गायदा कुणाचा आणि तोटा कुणाचा याचा आता हिशोब कार्यकर्ते करू लागले आहेत.
महाराष्ट्रात काँग्रेसयुक्त भाजपमुळे संघ व भाजपनिष्ठावंतांचा कोंडमारा
RELATED ARTICLES