Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीभाजप-सेनेच्या सातार्‍यातील दोन नामदारांच्या भेटीने युतीच्या खेळीला आला बहार

भाजप-सेनेच्या सातार्‍यातील दोन नामदारांच्या भेटीने युतीच्या खेळीला आला बहार

सातारा : सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी समतेचा संदेश दिला आहे. त्यांच्या विचाराने वाटचाल सुरू आहे.असे वाक्य सातारा जिल्हाने चाळीस ते पंचेचाळीस वर्ष ऐकले होते. आता मात्र, भाजप-सेना, आर पी आयच्या शिरकाव्याने जय श्रीराम,, जय महाराष्ट्र,,जय भिम चा आवाज जिल्ह्यात घुमू लागला आहे. युतीच्या खेळीने प्रथमच जिल्ह्यात बहार येण्यास सुरुवात झाली असून भगवे वातावरण दिसू लागले आहे.
काल दुपारी सातार्‍यात शासकीय विश्रामगृह येथे भाजप नेते व पश्चिम महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक साहेबराव पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर त्यांनी कक्ष क्रमांक एक येथील अजिंक्यताराचा ताबा घेतला. याठिकाणी अनेक मान्यवरांसह पत्रकारांनी नवनिर्वाचित अध्यक्ष पवार यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. त्याच वेळी शिवसेनेचे उपनेते व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष शिव व्याख्याते नितीन बानूगडे-पाटील विश्रामगृहात आले. त्यांनी कक्ष क्रमांक दोन मधील प्रतापगड कक्षात प्रवेश केला. काही शिवसैनिकांशी चर्चा करून ते कक्ष एक मध्ये आले. त्याठिकाणी श्री पवार यांना भला मोठा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.तसेच थोडा वेळ चर्चा करून निघून गेले. मात्र, भाजप-सेनेच्या दोन नामदारांनी महत्वाच्या दोन कक्षेचा ताबा काही काळ घेतल्याने युतीचे समर्थक चांगलेच सुखावले होते.तर, काँग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या चेहर्‍यावर चिंतेची छबी दिसून येत होती.
सातारा ही छत्रपती शिवराय यांची राजधानी होती. आजही महाराजांचे वंशज सातार्‍यातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सक्रिय आहेत. पण, बदलत्या काळानुसार आता युतीचा बोलबाला सुरू झाला आहे. यापूर्वी सातारा जिल्ह्यातील अनेकांना महत्वाची पदे मिळाली की,कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन कामकाजाला सुरुवात केली जात होती. सध्या भाजप-सेना, आर. पी. आयच्या सरकार मुळे जय श्रीराम,,, जय महाराष्ट्र…जय भिम चा नाद निनादू लागला आहे. हे पाहताना,ऐकताना,, काँग्रेस-राष्ट्रवादी काही कार्यकर्त्यांना जुन्या आठवणी अस्वस्थ करू लागल्या आहेत.
ज्यांनी भाजप-सेना पक्ष प्रवेशापूर्वी स्व. चव्हाण साहेबांचे गोडवे गायले होते.त्यांना ही कराड येथील स्व. चव्हाण साहेबांच्या समाधीचा विसर पडला आहे असे वाटत आहे. एकेकाळी काँग्रेस व राष्ट्रवादीने महाराष्ट्रात राजकारण करताना सातारच्या छत्रपती ची गादी आणि कराड येथील स्व. चव्हाण साहेबांचा वारंवार वापर केला होता. दुर्दैवाने त्यांच्या विचारांची पाठराखण करण्यास दोन्ही काँग्रेस कमी पडल्याने सध्या सातारा जिल्हात युतीची घोडदौड सुरू झाल्याची भावना निर्माण झाली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular