महाबळेश्वरः महसुल विभागाने दिलेल्या दणक्याने पालिकेचा येथील बोटक्लब बंद करण्यात आला आणि आता त्या पाठोपाठ वन विभागाने दिलेल्या दणक्याने पालिकेने वेण्णा धरणाच्या माथ्यावरील वाहनतळाचे शुल्क आकारणी ऐन हंगामात बंद केली आहे. या दोन्ही घटनामुळे पालिकेला मोठा आर्थिक फटका बसत आहे दरम्यान या सर्व आर्थिक नुकसानीस मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांचा एककल्ली व मनमानी कारभार कारणीभुत असल्याची टिका शिवसेनेचे नगरसेवक संजय पिसाळ यांनी केली असुन या विषयावर पालिकेची तातडीची सर्वसाधारण सभा आयोजित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
वेण्णालेक बोटक्लब चालविण्याचा परवाना वेळेत नुतनीकरण करण्यात मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांनी वेळीच लक्ष न दिल्याने तो ऐन हंगामात बंद करण्याची वेळ पालिकेवर आली. आता परवाना नतुनीकरणाची धावपळ सुरू झाली आहे. बोटक्ल बंद करण्यात आल्यानंतर त्याचे नुतनीकरणासाठी सर्व नगरसेवकांची एक तातडीची बैठक आयोजित करणे आवश्यक होते पंरतु पालिकेचे कारभारी यांनी या बाबत कोणाला विश्वासात न घेता परस्पर नुतनीकरणासाठी हालचाली सुरू केल्या. दोन आठवडयांपेक्षा अधिक कालावधी लोटला तरी परवाना नतुनीकरण करण्यात कारभारी यांना यश आले नाही. बोटक्लब बंद असतानाच आता ऐन हंगामात वेण्णाधरणाच्या माथ्यावरील वाहनतळावरील वाहनांची शुल्क आकारणी पालिकेला बंद करावी लागली आहे. या बाबत अधिक माहीती घेतली असता वेण्णा धरणाची मुळ जागा ही वन विभागाची आहे. वेण्णाधरण बांधण्यासाठी वन विभागाने ही सर्व जागा सिंचन विभागाच्या व महाराष्ट् जीवन प्राधिकारण यांच्या ताब्यात दिली. वेण्णाधरणाची मालकी पालिकेची नसताना वेण्णाधरणाच्या माथ्यावरील मोकळया जागेचा पालिकेने वाहनतळ म्हणुन वापर सुरू केला असुन वाहनतळावर वाहनांकडुन पालिका शुल्क आकारणी करून चांगले उत्पन्न मिळविते. यासाठी पालिकेचे चार कर्मचारी तेथे तैनात करण्यात आले आहे ही बाब वन विभागाच्या लक्षात आली व त्यांनी वेण्णाधरणाच्या माथ्यावर पालिकेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या वाहनतळाचा पंचनामा केला व तेथील पालिकेच्या सर्व कर्मचारी यांचा जबाब नोंदविला ही बाब पालिकेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या बाबत कोणालाही विश्वासात न घेता वाहनतळाची शुल्क आकारणी परस्पर बंद केली.प्रथम बोटक्ल बंद असल्याने रोज पालिकेला मोठा आर्थिक फटका बसत असताना आता बोटक्लब पाठोपाठ वाहनतळावरील शुल्क आकारणी बंद झाल्याने त्याचाही मोठा आर्थिक फटका पालिकेला बसला आहे. पालिकेत सुरू असलेल्या मनमानी कारभारा मुळेच पालिकेेचे एक एक उत्पन्नाचे साधन बंद पडत चालले आहे त्यामुळे पालिकेतील गलथान कारभार पुन्हा चव्हाटयावर आला आहे. नगराध्यक्षा आणि मुख्याधिकारी यांचा पालिकेतील मनमानी व एककल्ली कारभाराबाबत सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवकां मध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातो.
वेण्णालेक येथे बोटक्लब व वाहनतळ हे पालिकेच्या उत्पन्नाचे महत्वाचे साधन आहे. गेली अनेक वर्षां पासुन पालिका हे उत्पन्न घेत आली आहे ज्या वेळी धरण नव्हते तेव्हाही बोटक्लब व वाहनतळ पालिका चालवित होती वाहनतळासाठी पालिकेच्या ताब्यात एक एकर जागा दिली गेली होती. त्यामुळे वाहनतळावर शुल्क आकारणी करण्याचा पालिकेचा अधिकारी आहे पंरतु पालिकेत सध्या मनमानी कारभार सुरू आहे. मुख्याधिकारी कोणताही धोका नको म्हणुन एक एक उत्पन्नाचे साधन बंद करीत सुटल्या आहेत हे महाबळेश्वर शहराचे दुर्दैव आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
बोटक्लब पाठोपाठ वाहनतळ बंद, पालिकेला मोठा आर्थिक फटका
RELATED ARTICLES