म्हसवड : शासनाने मदत देऊ अगर न देऊ ,माणदेशी फौंडेशनची सुरू असलेली जनावरांची चारा छावणी ही सुरू ठेवली जाणार असल्याचे छावणी चालक विजय सिन्हा यांनी सांगितले.
गेली चार महिन्यापासुन जानेवारी महिन्यापासुन सुरू असलेल्या म्हसवड येथिल माणदेशी फौंडशनने चालवलेली चारा छावणी पाणी उपलब्ध होत नसल्याने बंद होणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती.त्यामुळे माणदेशी फौंडेशनने चारा छावणी बंद करणार अशा आशयाच्या बातम्या विविध दैनिकातून छापुन आल्या होत्या त्या मुळे या छावणीवर गेल्या चार महिन्यापासुन नऊ तेे दहा हजार जनावरे असलेल्या शेतक-यांची घाबरगुंडी उडाली होती . पोटच्या पोरा प्रमाणे संभाळलेली जनावरे कसायाच्या हवाली करण्याची वेळ आली होती भयंंकर दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेवुन म्हसवड येथिल माणदेशी फौंडेशनने गेल्या चार महिन्यापासुन जानेवारी महिन्यापासुन बजाज फौंडेशनच्या सहकार्याने महाराष्ट्रात एकमेव चारा छावणी सुरू केली आहे या छावणी वर नऊ ते दहा हजार माण तालुक्यासह परजिल्ह्यातील व परतालुक्यातील जनावरे या चारा छावणी वर आहेत या जनावराबरोबर शेतकरीही या छावणी वर मुक्कामी आहेत या छावणी वर जनावरांना मुबलक चारा पाणी दिला जात असुन या जनावरांसोबत असलेल्या शेतक-याना उन्हापासुन सरंक्षण मिळण्यासाठी नेट, रात्री उजेडा साठी एल ई डी लाईट सारख्या गरजा हि माणदेशी फौंडेशनने दिल्या होत्या मात्र सद्या उन्हाचा कहर सुरू असुन पाण्याची समस्या निर्माण झाली असुन पाणीच उपलब्ध होत नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे त्यातच बजाज फौंडेशनचा ही करार संपला असुन छावणी बंद करावी लागणार असल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्यामुळे छावणी वरील शेतकरी चिंतेत पडला होता
या पार्श्वभुमिवर माणदेशी फौंडेशनचे विजय सिन्हा यांनी नुकतीच मेघासिटी येथिल चारा छावणी तील शेतक-यांची बैठक घेतली यावेळी करण सिन्हा उपस्थित होते यावेळी बोलताना विजय सिन्हा म्हणाले गेल्या चार महिन्यापासुन हि छावणी सुरू आहे या छावणी तील जनावरांना सद्या पाणीच उपलब्ध होत नसल्यामुळे छावणी बंद करण्याची आमची मानसिकता झाली असल्याचे सांगितले व अशा आशयाच्या बातम्या प्रसिध्द झाल्यामुळे शासनानेही याची दखल घेतली असुन महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील व मंत्री सदाभाऊ खोत यांचे छावणी संदर्भात चेतना सिन्हा यांच्याशी चर्चा झाली असुन छावणी बंद करू नयेे छावणी तील जनावरांना प्रशासना कडून पाणी पुरवठा करण्याचे अश्वासन दिले आहे परंतू सद्या पाण्याची उपलब्ध ताच नसल्याने आमचाही नाईलाज झाला असुन परजिल्ह्यातील परतालुक्यातील शेतक-यांनी त्यांना त्यांच्या तालुक्यात शासनाने चारा छावणी चा पर्याय उपलब्ध करून दिला असुन त्या संबधित शेतक-यांनी तो पर्याय निवडावा असेही सिन्हा म्हणाले कारण फौंडेशनची हि छावणी अगदी डिसेंबर पर्यत चालवायची तयारी आहे त्यातच या भागात पडणारा मौसमी पाऊस हा सप्टेंबर नंतरच पडतो त्यामुळे अजुन चार ते पाच महिने तर पाण्याची टंचाई हि जाणवनारच आहे त्यामुळे तालुक्यातील शेतक-यांचे लाख मोलाचे असणारे पशुधन वाचने गरजेचे असल्यामुळे शासनाने मदत देऊ अगर न देऊ आम्ही हि छावणी सुरू ठेवणार असुन शेतक-यांनी चिंता करू नये असा दिलासा सिन्हा यांनी छावणी तील शेतक-यांना दिला आहे
5 मे रोजी छावणी संदर्भात श्रीमती चेतना सिन्हा,ना.चंद्रकांतदादा पाटील,ना.सदाभाऊ खोत,आमदार जयकुमार गोरे यांनी बैठक होणार असून या बैठकीत काय निर्णय होणार याकडे शेतकऱयांचे लक्ष लागून राहिले आहे.तर बैठकीत काहीही निर्णय झाला तरी किमान डिसेंबर महिन्यापर्यंत चारा छावणी सुरूच ठेवणार असल्याचे विजय सिन्हा यांनी सांगितले.
हि चारा छावणी बंद होणार असल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्यामुळे तालुक्यातील काहि भागात शासनाने चारा छावण्या सुरू केल्याने त्या त्या भागातील शेतकरी आपली जनावरे त्याच्या भागातील छावणी वर घेवुन गेले असता संबधित शासनाने सुरू केलेल्या छावणी चालक हे या शेतक-यांशी उध्दट बोलत असुन का गुरवाचा निवद संपला का रे असे उद्धट बोलत असल्याचे शेतक-यांनी सांगितले यावर बोलताना विजय सिन्हा म्हणाले देवाचा निवद कधीच संपत नाही या देवाचा निवद गुरवांनी खाऊन राहिलेल्या खरकट्यावर तुझ्या चार पिढ्या जगतील त्यामुळे मुकी जनावरे हे देवाचीच रूपे असुन या जनावरांच्या छावणी त राजकारण करू नये असे विजय सिन्हा म्हणाले
सद्या या माणदेशी फौंडेशनच्या सुरू असलेल्या जनावरांच्या चारा छावणीतील आज पर्यंत 1200 ते 1300 जनावरे शासनाने सुरू केलेल्या त्या त्या भागातील चारा छावणी त गेली असुन आता या छावणी त 8454 जनावरे राहिली असुन यातील आणखी काही जनावरे जाणार असल्याची माहिती फौंडेशनने दिली आहे.
शासनाने मदत देऊ अगर न देऊ ,माणदेशी फौंडेशनची चारा छावणी सुरु राहणार
RELATED ARTICLES