मतभेद बाजूला सारून सत्ता परिवर्तन हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवा
सातारा येथील मेळाव्यात आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रतिपादन
सातारा : राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची आघाडी तुटली सरकार पडले. त्यामुळे पुन्हा झालेल्या निवडणूकीत भाजपा युतीचे सरकार आले. आता पुन्हा दोन्ही काँग्रेस एकत्र आली आहे. पंतप्रधानांनी अर्थसंकल्पात शेतकंर्यासाठी पोकळ घोषणा केल्या आहेत त्यामध्ये भुमिहिन शेतकर्यांचा विचार केला नाही. काही मतभेद असतील ते बाजूला सारून सत्ता परिवर्तन हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवा कामाला लागा असे आदेश माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा येथील मेळाव्यात बोलताना दिले.
सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर पदग्रहण समारंभ व जाहीर मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी आ. जयकूमार गोरे, आ.आनंदराव पाटील, आ. मोहनराव कदम, माजी. खा.हिंदुराव नाईक निंबाळकर, धैर्यशील कदम ,मनोहर शिंदे,युवक जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, रजनी पवार ,सुनील काटकर, अॅड. विजयराव कणसे आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,1999च्या विशिष्ट परिस्थितीनंतर काँग्रेसच्या बालेकिल्ल्याची 2 शकले पडली.त्यावेळी सहकार चळवळीत पकड मजबूत नसल्याने जिल्ह्यात काँग्रेस पक्ष कमी पडला. जिल्ह्याला उज्वल पंरपरा लाभली आहे. जिल्ह्यने महाराष्ट्राच्या राजकारणाला विचार दिले आहेत. सातारा जिल्ह्यात काँग्रेसची वैभवशाली पंरपंरा पुन्हा उभी करूयात. काँग्रेसला लहान, मोठ्या , ज्येष्ठ कार्यकर्त्यांना बरोबर घेवून जाणारा अध्यक्ष मिळाला आहे.पहिल्यांदाच सक्रीय नेते व्यासपिठावर आले आहेत.काँग्रेसला गतवैभव मिळविण्यासाठी प्रत्येक तालु्नयात मेळावे घेवून कार्यकर्ते जागे करणे गरजेचे आहे. तळागाळात काँग्रेस गेल्यानंतर गांधी मैदानावर भव्य दिव्य मेळावा घेवूयात.2014 साली 5 मार्चला लोकसभेची आचारसंहिता लागली होती. आगामी निवडणूकीची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असले तरी हे आणीबाणीचे अधिवेशन आहे. सरकारला दोन्ही निवडणूका एकत्र घ्यावयाच्या असतील तर त्यांना विधानसभा बरखास्त करावी लागेल. महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला आहे. एप्रिल व मे मध्ये काय परिस्थिती निर्माण होईल हे सांगता येणार नाही. आमच्या कार्यकाळात दुष्काळ पडला होता त्यावेळी 10 लाख जनावरे छावण्यामध्ये संभाळली होती.त्यातील सर्वात मोठी छावणी म्हसवडमध्ये होती मात्र आताचे सरकार जनावरांच्या छावण्या सुरू करण्यामध्ये मागे पुढे बघत आहे. पाणी टंचाई डोळ्यासमोर आहे. माणसांना पिण्यासाठी पाणी नाही.तर जनावरांना कसे द्यायचे अशी भिषण परिस्थिती मुख्यमंत्री मान्य करत नाहीत. वारंवार पत्रव्यवहार केला नेते दुष्काळी भागात यायला तयार नाहीत. अगामी निवडणूकीत मते मागायला गेल्यास त्यांना कोणी फिरू देणार नाही.
गत निवडणूकीत राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची आघाडी तुटली सरकार पडले. त्यामुळे पुन्हा झालेल्या निवडणूकीत भाजपा युतीचे सरकार आले. मात्र या सरकारने शेतकर्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. पंतप्रधानांनी अर्थसंकल्पात शेतकंर्यासाठी पोकळ घोषणा केल्या आहेत त्यामध्ये भुमिहिन शेतकर्यांचा विचार केला नाही. गरीब शेतकर्यांना श्रीमंत बनविण्याच्या फसव्या घोषणांचा पाउस पाडण्यात आला. आता जिल्ह्यात तालुक्यात काही मतभेद असतील ते बाजूला सारून सत्ता परिवर्तन हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवा. भाजपाचे आमदार, पदाधिकारी भगिनीवर अन्याय अत्याचार करतात त्यांना पाठीशी घालण्याचे काम त्यांचे पक्षश्रेष्ठीच करत आहेत.जिल्ह्यात मित्र पक्षाकडून न्याय मिळाला नाही.देशातील व राज्यातील शत्रूला पराभव केला पाहिजे त्यासाठी 22 पक्षांजी मोठ बांधली आहे. ही लढाई जिंकायची आहे मे 2014 च्या निवडणूकीत 22 पक्ष विखुरले होते त्यामुळे मोदींच्या भाजपाला 31 टक्के मते मिळून ते सत्तेत आले आता 22 पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदीच्या भाजपाला बहुमत मिळणार नाही. हिंदी राज्यात 100 ते 113 जागावर समाधान मानावे लागणार आहे. सरकार स्थापन करण्यासाठी एकही आघाडी त्यांना मिळणार नाही. जिल्ह्यातील काँग्रेस मजबूत करण्यासाठी आपआपसातील मतभेद बाजूला करून सर्वांनी एकत्र आले पाहिजे.कोण म्हणतंय पुण्यातुन तर कोण म्हणतंय सांगलीतून तर कोण म्हणतंय नागपूर मधून लढा मी सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिणमधूनच विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. पुन्हा देशात व राज्यात काँग्रेसच्या विचारांचे सरकार आणावयाचे आहे त्यासाठी मी राफेलचा भ्रष्टाचार, शेतकर्यांची फसवणूक आदी मुद्दे घेणार आहे.नवीन आघाडीमध्ये नवीन संघटना बळकट केली पाहिजें. महाराष्ट्रात व देशात बहुजन समाजाच्या हिताचे सरकार आणावयाचे आहे.सर्वांनी हातात हात घालुन काम करूया जिल्हत नवी काँग्रेस उभी करून आपला विजय निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, सातारा जिल्हा हा क्रांतीविरांचा जिल्हा आहे या जबाबदारीची जाणीव निश्चितपणे आहे.काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचे शिवधनुष्य उचलताना दहा वेळा विचार केला कारण सर्वांना बरोबर घेवून जाण्याची जबाबदारी कठीण आहे.अनेक लोकांचा मानसन्मान ठेवावा लागतो.कोणीही दुखावले जाणार नाही, कमीपणा येणार नाही हा मी शब्द देतो.पक्षवाढीसाठी जे जे करावे लागेल त्याला मी कमी पडणार नाही.उद्योगाचे जाळे व व्याप उभे केले तरी ते बाजूला ठेवून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडणार आहे. जिल्ह्याची जबाबदारी सर्वांनाच पेलावी लागणार आहे. काही निर्णय कठूपणे घ्यावे लागणार आहेत.काँग्रेस कार्यकर्त्यांचे रक्षण व संरक्षण केले पाहिजे प्रसंगी संघर्षाला सामोरे जावे लागणार आहे.पुढील मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबाच पाहिजेत हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी काम केले पाहिजेे. तालुकास्तरावर गावोगावी जावू बैठका घेवून तेथील नागरिकांच्या अडीअडचणी समजुन घेतल्या जाणार आहेत.हा ट्रेलर आहे प्निचर अभी बाकी आहे. या ठिकाणी लाखाच्यापेक्षा मोठा मेळावा घ्यायला आम्ही तयार आहोत.सत्तेच्या विरोधात संघर्ष करताना हातात हात घालून काम करावे लागणार आहे.चांद्यापासुन बांद्यापर्यंत व गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न केला जाणार आहे.
युवकचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे म्हणाले, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पदग्रहण समारंभ व जाहीर मेळाव्यामुळे काँग्रेस कमिटीमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. युवा चेहरा म्हणून जिल्हाध्यक्ष लाभले.पृथ्वीराज बाबांचे हात बळकट करावयाचे असतील तर तळागाळापर्यंत काँग्रेस पक्षाचे विचार पोहोचवले पाहिजेत. काँग्रेसचे विचार व धोरणे माणसा माणसात ऋुजविली पाहिजेत.युवक काँग्रेसच्या माध्यमातून पुन्हा काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.यावेळी धनश्री महाडीक यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास निरीक्षक प्रकाश सातपुते, बाबासाहेब कदम, प्रल्हाद चव्हाण, रविंद्र झुटींग, नंदाभाउ जाधव,जि.प.सदस्य भिमराव पाटील,अरूण गोरे, जिजामाला नाईक निंबाळकर, बाळासाहेब बागवान व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा सत्कार गांधी टोपी व भला मोठा पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.जयकुमार शिंदे यांनी आभार मानले.
मतभेद बाजूला सारून सत्ता परिवर्तन हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवा , सातारा येथील मेळाव्यात आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रतिपादन
RELATED ARTICLES