मायणी : – (सतीश डोंगरे मायणी) मायणी प्रादेशिक नळपाणी योजनेची लाईट बिलाची कोट्यावधी रुपयांची थकबाकी ,यासह गत सत्ताधाऱ्यांनी अनावश्यक ठिकाणी केलेला खर्च ,प्रत्यक्ष कामाचा खर्च आणि दाखवण्यात आलेली कामांची बिले यामध्ये मोठी तफावत आढळून आली आहे , याप्रमाणे अनेक वर्षांपासून विरोधकांकडून सत्तेचा करण्यात आलेला दुरुपयोग याचे संपूर्ण ऑडिट करून मायणी ग्रामपंचायतीत करण्यात आलेला भ्रष्टाचार लवकरच बाहेर काढणार आहे , असे वक्तव्य आ.डा़ँ.दिलीप येळगावकर यांनी मायणी येथील त्यांच्या निवासस्थांनात आयोजित पत्रकार परिषदेत केले.
डाँ.येळगावकर म्हणाले, तालुक्यातील मायणी सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे.मात्र आज पर्यन्त कोणताही विकास या गावाचा झाला नाही. चांदनदी पुनर्जीवित करण्याच्या जलसंधारण कामाकडे गत ग्रामपंचायतीने केलेल्या दुर्लक्षामुळे व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या जलसंधारण कामांच्या तुलनेत मायणी गावात सन २०१७-१८या काळातील जलसंधारणाची कामेच न झाल्यामुळे आज ९६ लाख रुपयांचा निधी परत जाण्याची भिती व्यक्त होत आहे आणि याचा परिणाम पुढील २०१८-१९ या वर्षाच्या जलयुक्त शिवार गावांच्या यादीत मायणीच्या समावेशाबद्दल हि अडथळे येऊ शकतात. सरपंच सचिन गुदगे व उपसरपंच यांच्या सह सदस्यांनी मायणी ग्रामपंचतीचा पदभार स्वीकारल्यानंतर तेथील जमाखर्च पहिला असता ,ग्रामपंचायतीच्या तिजोरीत खडखडाट झाला असून अनावश्यक ठिकाणी खर्च करण्यात आल्याचे येथे दिसून आले आहे या सर्व प्रकारच्या संपूर्ण तपास करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या कारभाराचे ऑडिट करण्यात येणार आहे .व येथे झालेला भ्रष्टाचार बाहेर काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले .
यासह मायणीच्या अंर्तगत गावातील मुख्य पंढरपुर मल्हारपेठ राज्यावरील रस्त्याच्या दुतर्फा असणारे सांडपाण्याची गटारे भुमिगत करणे याबरोबर सांडपाणी शुद्धिकरण प्रकल्प मायणीत राबविण्यात येणार आहे ,तसेच गावातील अोला सुका कचरा वेगळीकरण प्रकल्प,तसेच गावात खऱ्या अर्थाने कार्य करणाऱ्या तंटामुक्ती समितीची नव्याने स्थापना करणे ही कामे नजीकच्या काळात पूर्ण करण्यात येणार आहेत .असल्याची माहिती डॉ येळगावकर यांनी दिली.
यावेळी सरपंच सचिन गुदगे म्हणाले “ग्रामिण विकास कार्यक्रमांर्तगत ” स्वच्छ सुंदर मायणी व स्वयंपुर्ण आदर्श मायणी करण्याचा आमचा मानस असुन गावातील मुख्य नळपाणी योजनेच्या पाईपची गळती काढण्याचे काम निधी नसतानाही आज पन्नास टक्के पुर्ण झाले आहे.येत्या एका महिन्यामध्ये गावातील शंभरटक्के गळती बंद होईल.सध्या .ग्रामसेवक गावात वेळेवर येत नाही व त्यांचा मोबाईल ही बंद असल्याने अनेक शासकीय कामे रखडत आहेत.त्यामुळे ग्रामसेवक बदलण्याची मागणी आम्ही केली आहे.
उपसरपंच सुरज पाटील म्हणाले ,गत सत्ताधारांनी मोठया प्रमाणावर आफरातफर केली आहे.ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विविध गाळ्यांच्या डिपाँझिट (सुरक्षा ठेव )ची संपुर्ण रक्कम खर्च केली असुन अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार केलेला असल्यामुळे ग्रामपंचायतीचे इंटरनल व स्ट्रचर ऑडिटही करण्यात येणार असल्याचे त्यांनी या पत्रकार परीषदेत सांगितले.
एक ते दिड महिण्यात टेंभु पाण्याचा मार्ग मोकळा होईल-मायणी तलाव्यात टेंभु योजनेचे पाणी सोडण्यासाठी जलसंधारण विभागामार्फत थोडे अडथळे आणले जात आहेत. शासकिय पातळीवरील कामे मार्गी लागली आहेत .यासाठीचा निधी ही संबंधीत खात्याकडे वर्ग झाला आहे.त्यामुळे येत्या एक ते दिड महिण्यात या योजनेचा मार्ग मोकळा होऊन प्रत्येक्क्षात काम सुरु होईल :- माजी आ. डाँ.दिलीप येळगावकर
– पंढरपूर -मल्हारपेठ या मार्गावरील गावाच्या पुर्व व पश्चिम बाजुस असणाऱ्या दोन्ही पुलाची दुरुस्ती करुन त्याससंरक्षण कट्टा तयार करणे व यासह ब्रिटिशकालीन पुलाची दुरुस्ती व रुंदीकरण यासाठी दीडकोटी हुन अधिक निधी सार्वजनिक व महसूल मंत्री मा चंद्रकांत दादा पाटील यांचेकडून मंजूर,काम लवकरात लवकर पूर्णत्वास- डॉ येळगावकर.
यावेळी शिवाजी पाटील ,विजय कवडे, जालिंदर माळी,दत्तात्रय थोरात, सोमनाथ माळी,जर्नादन भिसे,राजाराम कचरे,आनंदा शेवाळे,राजेंद्र ठोंबरे,अभिजीत माळी, आदी मान्यवर उपस्थित होते.