साताराः केंद्र-राज्यात भाजपा सत्तेत आल्यानंतर वर्णव्यवस्थेला अनुसरुन कारभार सुरू आहे. याचा फटका वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना बसत असून शासनाच्या धोरणाविरोधात काँग्रेसने सातार्यात संविधान बचाव रॅली काढून निषेध नोंदवला. आ. आनंदराव पाटील, रजनी पवार, यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटीतून बैलगाड्यांसह निघालेल्या रॅलीचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात करण्यात आला.
यावेळी आ. पाटील म्हणाले, गेल्या तीन वर्षात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून घोषणांच्या बदल्यात नागरिकांची शासन फसवणूक करत आहे. सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला खोटी आश्वासने देणारे आता तोंडाला पाने पुसत असून देशात सबका साथ सबका विकासफ हे काँग्रेसच करत आले असून त्यामुळेच काँग्रेसच्या पाठीशी जनाधार उभा राहिला आहे. हे शासन वर्णव्यवस्थेप्रमाणे कारभार करुन गोरगरीबांना वेठीशी धरत आहे. त्यामुळे संविधान बचाव रॅलीच्या माध्यमातून भाजप शासनाचा कडाडून निषेध देशभर सुरू आहे. महिला आघाडीच्यावतीने पवार म्हणाल्या, काँग्रेस शासनाच्या काळात महागाई आणि शिक्षण-आरोग्यविषयी धोरणांवर कडाडून टीका करणारे आज सत्तेत आल्यानंतर लोकांची फसवणूक करत आहेत. स्मृती इराणी या मंत्री असून आता त्यांनी मोदींना बांगड्या भराव्यात म्हणजे त्यांच्या भूमिकेविषयी शंका राहणार नाही. सीमेवर जवान शहीद होत असताना हे सरकार जसे ग्रामीण भागातील लाभार्थी उभे करत आहे तसे स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मश्गुल आहे.
लघुउद्योजकांना संपवताना पतंजलीसारख्या कंपन्यांचे मार्केटिंग सरकार करत आहे. पोकळ घोषणा करुन कोणाच्या खात्यात दमडीही न टाकता मिरवणारे सत्ताधारी जनप्रक्षोभापुढे भविष्यात टिकणार नाही. लोकांच्या सहभागामुळे ते अधोरेखित झाले आहे. यावेळी अॅड.विजयराव कणसे, बाळासाहेब शिरसाट, राजू जेधे, रविंद्र झुटिंग, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, स्मिता हुलवान, साजिद शेख, नंदा खंदारे, मनोजकुमार तपासे, दिशा भंडारी, विद्या थोरवडे, वैशाली वाघमारे, रझिया शेख यांच्यासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपा शासनाविरोधात कडाडून टीका व घोषणाबाजी ; सातार्यात काँग्रेसची संविधान बचाव रॅली
RELATED ARTICLES