साताराः मानवी मुत्यूचे कर्दनकाळ ठरलेल्या पुणे बेंगलोर महामार्ग वरील खंडाळा तालुक्याच्या हद्दीतील एस वळण सरळ करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने या विषयाला आता गती मिळाली आहे. दुर्घटनचे केंद्रबिंदू ठरलेल्या या एस वळणावर झालेल्या मनुष्य हानीमुळे अनेकांचे कुटूंब उध्दस्त झाले आहेत. महामार्ग सुरक्षेतची दक्षता घेणार्या यत्रंनेला यामध्ये पूर्णपणे अपयश आले आहे. रस्ते अपघातामध्ये मानवी मुत्यूचे प्रमाण पाहता ही राष्ट्रीय समस्या निर्माण झाली आहे. महामार्ग व उपमार्गवरील अनेक वळणे हे वाहतूकीला धोकादायक ठरत आहेत यामध्ये प्रामुख्याने साताराहून पुणेकडे जाताना वर्ये गावच्या हद्दीतील असेच यूटर्नचा मार्ग संध्या वाहन चालकापुढे मोठेे सकंट म्हणून उभे राहिले आहे या वळणावर वाहतूक करणे अत्यत धोक्याचे ठरत आहे त्यात रस्त्याकडेला वाढलेली झाडेझुडपेचा त्रास ही वाहनचालकाना सहन करावा लागत आहे. मूळात अरुंद रस्ता त्यात यू टर्न मार्ग मुळे अनेकदा या वळणावर अपघात घडले आहेत. बर्याचदा यू टर्न घेताना वाहने नदीपात्रात पडली आहेत रुंदीकरणाच्या प्रतिक्षेत असलेला वर्ये नजीकच्या या यूटर्न बाबत अनेकदा वाहनचालक व नागरिकानी वेळोवेळी सबधित विभागकडे तक्रारी नोंदवून ही प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. यामार्गवरुन वाहतूकेचे प्रमाण वाढले असून भविष्यातील होणारी मनुष्य हानी टाळण्यासाठी यूटर्नचे रुंदी करण व्हावे अशी नागरिक व वाहनचालकांमधून मागणी होत आहे.
वर्ये नजीकच्या यूटर्न व पुढे असलेला अरुंद पूल हा वाहतूकीसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे या मार्गवर वाहनाची ये जा मोठया प्रमाणात असलेल्याने यूटर्नचे रुंदीकरण तातडीने होणे गरजचे आहे परिसरत वाढलेली नागरीवस्ती व वाहतूकीची ये जा पाहाता यामार्गवरुन वाहतूक करणे धोक्याचे ठरत आहे प्रशासनाने खंडाळयाच्या एस वळणाप्रमाणे वर्येच्या यूटनर्र्लाही न्याय दयावा
वर्ये नजीकचा टर्न देई अपघाताला निमंत्रण ; खंडाळयाच्या एस वळणाला गती ………वर्ये नजीकच्या यू टर्नचे काय?
RELATED ARTICLES