म्हासुर्णे ( प्रतिनिधी तुषार माने ): दुष्काळी भागातील सोसायटीने शंभर टक्के वसुल करुन आपल्या नफ्यातुन सोसायटीची इमारत उभी केली आणि त्या इमारतीत जिल्हा बॅक घेवुन सोसायटीच्या उत्पन्नात वाढ केली हि बाब अभिमानास्पद असल्याचे मत मा.आमदार प्रभाकर घार्गे यांनी माडले
ते म्हासुर्णे ता.खटाव येथे आयोजित केलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेच्या नविन जागेत स्थलांतर कार्यक्रमात बोलत होते,
यावेळी आ.बाळासाहेब पाटील,राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनिल माने,सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्तु शेठ सुर्यवंशी ,जिल्हा बँकेचे संचालक व जि.प.सदस्य प्रदिप विधाते,संचालक अर्जुनराव खाडे,मार्केट कमेठी माजी सभापती सी.एम.पाटील.मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे,उमेश उबरदंडसाहेब,सुबोध अभ्यंकरसाहेब ,माजी समाजकल्याण सभापती मानसिंग माळवे,प.स.सदस्य जयश्री कदम,रेखा.घार्गे,चंद्रकांत पाटील,धनाजी पावशे,शिक्षण सल्लागार मंडळाचे चेअरमन महादेव माने,राजाराम माने,ग्रामपंचायत सदस्य तुषार माने,विठ्ठल माने,विभागिय विकास अधिकारी उध्दव देशमुख ,शाखाधिकारी सुनिल भाग्यवंत,कँशिअर सुनिल मोहिते साहेब आदींची उपस्थिती होती.
आ.बाळासाहेब पाटील म्हणाले की सोसायटीच्या जागेसाठी आलेल्या अडचणी दुर करुन ही इमारत उभी राहीली आहे
त्यामुळे गावाच्या विकासात भर पडली असे मत बाळासाहेब पाटील यांनी मांडले. या कार्यक्रमास राजाराम माने,विलास शिंदे,एम.पी.साहेब,गुलाब वायदंडे,विठ्ठल माने,सिकंदर मुल्ला,समाधान थोरात,हेमंत कुलकर्णी ,संजय माने,भरत माने,अधिक माने,दिपक सावंत,विलास माने,आण्णासो माने,नंदकुमार माने,गोरख माने,नाथा यमगर,रुपेश फाळके,दादाहय्यात सय्यद,शांताबाई निकम,यशोदाबाई सुर्यवंशी बँकेचे खातेदार ,ग्रामस्थ उपस्थित होते प्रास्तविक राजाराम माने यांनी केले तर आभार पाडुरंग माने गुरुजी यांनी मानले.
म्हासुर्णे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेचे नविन जागेत स्थलांतर
RELATED ARTICLES