सातारा : केंद्रशासनाने फायनान्स विभागाचे माध्यमातून भारतीय रिझर्व्ह बँक व राष्ट्रीय कृषी व गामीण विकास बँक (नाबार्ड) यांचे मार्फत आर्थिक समावेशीकरण ही योजना कार्यान्वित केलेली आहे . या प्रयत्नांचाच एक महत्वपूर्ण भाग म्हणजे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गुणवत्तापूर्वक विकसीत केलेली मोबाईल बँकिंग एटीएम व्हॅन आहे . या बँकेने एक प्रकारची फिरती शाखा निर्माण केली असून यामध्ये ग्राहकांना एटीएम मधून तात्काळ पैसे काढता येणार आहे . तसेच नवीन खाती उघडून घेतली जाणार आहेत . केंद्रशासनाचे विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे . सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नाबार्डच्या सर्व योजानांचा लाभ पूर्ण क्षमतेने वेळोवेळी घेतला असून याचा लाभ ग्रामीण जनतेला व गरजुंना दिलेला आहे . तसेच नाबार्डच्या सर्व निकषांची व अपेक्षांची पूर्तता या बँकेने केली असल्याने सातारा जिल्हा बँक ही राज्यात व देशात अग्रगण्य अशी बँक ठरलेली आहे . या बँकेच्या संचालक मंडळ व व्यवस्थापनाला त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी मी नाबार्डमार्फत शुभेच्छा देतो असे गौरोव्दगार नाबार्डचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख मा .यु .डी .शिरसाळकर (चिफ जनरल मॅनेजर नाबार्ड पुणे) यांनी जिल्हा बँकेच्या मोबाईल बँकिंग एटीएम व्हॅनचे उदघाटन प्रसंगी काढले . सोबत नाबार्डचे जनरल मॅनेजर अलोक जेना हेही उपस्थित होते .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची तसेच संचालक आ .शशिकांत शिंदे, .प्रभाकर घार्गे, राजेंद्र राजपुरे, नितीन पाटील, प्रकाश बडेकर, वसंतराव मानकुमरे, प्रदिप विधाते, प्रा .अर्जुनराव खाडे, राजेश पाटील, संचालिका सौ .कांचन साळुंखे, सौ .सुरेखा पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ .राजेंद्र सरकाळे तसेच जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, नाबार्डचे सातारा जिल्हा प्रमुख श्री .सुबोध अभ्यंकर, बँकेचे सरव्यवस्थापक आर .एस .गाढवे, आर .एम .भिलारे, व्यवस्थापक प्रदीप शिंदे, शामराव गायकवाड, विनायक कदम, नाना लंगुटे यांची प्रमुख उपस्थिती होती . कार्यक्रमाचे सुत्र संचलन व्यवस्थापक श्री .सुजीत शेख यांनी केले . याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, नाबार्डच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने बँकेने विकसित केलेल्या मोबाईल बँकिंग -ढच् व्हॅनव्दारे बँकिंगच्या सर्व सेवा व सुविधा ग्राहकांना मिळणार असून, बँकेच्या विविध ठेव व कर्जाची माहिती प्रभावीपणे देवून त्याचा लाभही जिल्हयातील असंख्य ग्राहकांना घेता येणार आहे . सर्वात महत्वाचे म्हणजे कॅशलेस भारत- डिजीटल इंडीया ही संकल्पना साध्य होणार आहे .बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांना आपल्या प्रास्तविकात सांगितले की, देशाच्या आर्थिक विकासाला व ग्रामीण भारतातील शेतकरी, कष्टकरी, महिला, ग्रामीण कारागीर व ज्यांचे जीवनमान दैनंदिन उदरनिर्वाहावर अवलंबून आहे अशा वंचित घटकांना अद्याप बँकिंगच्या सेवा व सुविधांचा लाभ मिळालेल्या नाही, या सर्व स्थरातील महत्वपूर्ण गरजू व दुर्बल घटकांना सामावून घेणेसाठी रिच टू अनरिच ही संकल्पना आर्थिक समावेशीकरणामध्ये साध्य करणेसाठी विशेषतः ग्रामीण भागातील जनतेसाठी बँकांमार्फत मोठया प्रमाणावरती प्रयत्न केले जात आहेत . मोबाईल बँकिंग एटीएम व्हॅन यामध्ये तात्काळ एटीएम मधून पैसे काढणेची सुविधा उपलब्ध करून दिलेली असून, ग्राहकांची सर्व प्रकारची बीले स्विकारली जाणार आहेत . याबरोबरच नवीन खाते उघडून घेणे, सर्व प्रकारच्या ठेवी स्विकारणेची सोय यामध्ये आहे . प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व जीवनज्योती विमा योजना यांची माहिती देवून या योजनेत सहभागी करून घेतले जाणार आहेत . बँकेच्या विविध कर्ज योजनांची माहिती दिली जाणार आहे . थोडक्यात बँकेच्या ग्राहकांना प्रत्यक्ष बँकेत न जाता ही या फिरत्या शाखेचा लाभ मिळणार असलेने ग्राहकांचा वेळ वाचणार आहे व बँक आपले दारी ही संकल्पना साध्य होणार आहे . याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे अवाहन याप्रसंगी डॉ. सरकाळे यांनी केले सदर कार्यक्रमा दरम्यान बँकेचे संचालक आ .शशिकांत शिंदे यांनी, नाबार्ड व जिल्हा बँकेच्या संयुक्तीक उपक्रमातून आज कार्यान्वित झालेल्या मोबाईल बँकिंग एटीएम व्हॅन शुभारंभ कार्यक्रमा दरम्यान बँकेचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी अध्यक्ष श्रीमंत दादाराजे खर्डेकर साहेब यांचे दुःखद निधन झाले असलेने पुढील कार्यक्रम आपण स्थगीत करीत असलेचे सांगितले.बँकेचे संचालक माजी आ .प्रभाकर घार्गे यांनी श्रीमंत दादाराजे खर्डेकर यांना श्रध्दांजली वाहण्याचा सर्वांना अवाहन केले उभे राहणेची विनंती केली, व श्रध्दांजली अर्पण करून कार्यक्रम संपला असे जाहीर केले .
जिल्हा बँकेची मोबाईल बँकिंग एटीएम व्हॅन रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या अपेक्षांची निश्चित पूर्तता करेल! : यु .डी .शिरसाळकर
RELATED ARTICLES