Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीअधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने वडूजकरांचे लसीकरण रामभरोसे

अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने वडूजकरांचे लसीकरण रामभरोसे

वडूज ग्रामीण रुग्णालयात लस संपल्याने निराशाने बसलेले लोक ( छाया-निनाद जगताप, सातारा)

 सातारा : खटाव तालुक्याचे ठिकाण व नगरपंचायतीचा दर्जा असलेल्या वडूज नगरीची साडीसाथी सुटता सुटेना,कोरोना ची संकट गडद होऊनही शासकीय व आरोग्य विभागाच्या  काही आधिकऱ्यांमध्ये समनव्ययाच्या अभावाने लसीकरण रामभोरसे बनले आहे. गेली आठवडाभर जेष्ठ नागरिक व महिला वर्ग वडूज ग्रामीण रुग्णालयात येऊनही लस न घेता निराशापोटी माघारी जात आहे. आम्ही काळजी घेण्यासाठी लसीकरण करण्यासाठी येत आहे. पण,लसीचा तोकडा पुरवठा होत असल्याने सर्व आलबेल दिसून येत आहे अशी माहिती रुग्णालयात आलेल्या लोकांनी दिली आहे.                                     या बाबत माहिती अशी की, खटाव तालुक्यातील वडूज परिसरातील लोकसंख्या व मतदार यादीची पडताळणी करून लसीकरण होईल अशी आशा होती.पण, आता पर्यंत फक्त पंधरा टक्के लोकांच्या नशिबी लस आली आहे. उर्वरित लोकांना लस केव्हा उपलब्ध होणार? याची माहिती कोणीही जबाबदार अधिकारी सांगू शकत नाही. तहसिल कार्यालय,नगर पंचायत, आरोग्य विभाग यांच्या मध्ये कोणताही समनव्य नसल्याने किती लोकांना लस दिली?किती लस आल्या? किती लोक लसीकरणापासून वंचित आहेत? रुग्णालयात  रिक्त पदे कधी भरणार? याची आकडेवारीनुसार माहिती नाही. वरिष्ठ अधिकारी  खटाव तालुक्यातील मोजक्याच गावाला  भेटी देतात त्यापेक्षा स्वतःची सर्व आरोग्याची खबरदारी घेऊन वडूज ग्रामीण रुग्णालयाला भेटी देऊन लसीकरणा बाबत पाठपुरावा करणे गरजेचे आहे.तेच नेमके होत नाही. राजकीय वजन नसलेले   स्थानिक पातळीवर काही नेते आहेत. हेच वडुजकरांचे दुर्दैव असल्याचे रोखठोक मत व्यक्त केले जात आहे. पूर्वीची ग्रामपंचायत असती तर या समस्या उदभवल्या नसत्या .असे ही काहींनी सांगितले.                                सध्या लॉक डाउन मुळे व्यवहार बंद असून ही लसीकरण करण्यासाठी मिळेल त्या वाहनांनी लोक लस मिळेल या आशेने वडुज ग्रामीण रुग्णालयाला भेट देतात,लस दोनशे व लोक तीनशे अशी अवस्था दोन दिवसानंतर पहाण्यास मिळत आहे. त्यामुळे दररोज शंभर लोकांची लस मिळत नसल्याने निराशा होत आहे. हे असेच घडत असेल तर कॊरोना पासून आता देव सुध्दा वाचवू शकणार नाही.हे या गलथान कारभाराने लोकांना समजून चुकले आहे,अशी चर्चा सुरू झाली आहे.खटाव तालुक्यात समनव्याचा अभाव की काम करण्याची इच्छा वरिष्ठ अधिकाऱ्यांना नाही हेच या निमित्ताने समजू शकेल नाही. आता त्याची चाचणी कोण घेणार? हाच प्रश्न उभा राहिला आहे.

 दरम्यान, जेवढया तुटपुंज्या लस पदरात पाडून घेतल्या आहेत. तेवढ्याच लोकांना वडुज ग्रामीण रुग्णालयात रांगेत थांबवून ठेवावे. म्हणजे लसीकरणाची वाट पाहून ज्यांना लस मिळणार नाही. त्यांना ज्यादा त्रास सहन करावा लागणार नाही. अशी प्रतिक्रिया काँग्रेस खटाव तालुका अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष दाऊद मुल्ला व जेष्ठ नागरिकांनी  दिली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular