सातारा : आजच्या धावपळीच्या युगात मानवापुढे अनंत समस्या उभ्या असतात. रोजचे दैनंदीन जीवन जगताना सदृढ माणसांनाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. सामान्य माणसांपेक्षाही दिव्यांग आणि अपंग बांधवांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांचे जीवन सुखकर व्हावे, त्यांना कोठेतरी आधार मिळावा यासाठी प्रयत्न करणे, त्यांच्या अडचणी दूर करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
पिलाणी (खालची ता. सातारा) येथील सचिन जनार्दन कदम हे जन्मापासूनच अपंग आहेत. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने पुर्णत: अपंग असलेल्या कदम यांनी अपंगत्वापुढे न झुकता स्वाभिमानाने उभे राहण्यासाठी गावात पिठाची गिरणी चालवण्याचे काम सुरु केले आहे. मात्र, पुर्ण अपंग असल्याने त्यांना चालता येत नाही. त्यामुळे त्यांना त्यांचा व्यवसाय सांभाळणे कठीण जात होते. अपंग आणि दिव्यांगांना शासनाच्या योजनांवर अवलंबून न ठेवता स्वत: वैयक्तीक मदत करणारे आ. शिवेंद्रसिंहाजे भोसले यांना कदम यांची काही मित्रमंडळी येवून भेटली व कदम यांची अडचण त्यांना सांगितली. यानंतर तातडीने आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सचिन कदम यांना तीनचाकी सायकल भेट देण्याचे जाहिर केले. जाहिर केल्यानुसार आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कदम यांना तीनचाकी सायकल नुकतीच भेट दिली. यावेळी नगरसेवक शेखर मोरे- पाटील, किरण साबळे, संतोष कदम, राजू यादव, मनोज गायकवाड, नाना इंदलकर आदी उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यामुळे आधार मिळाला असून आपले पुढील जीवन सुसह्य केल्याबद्दल कदम आणि पिलाणीच्या ग्रामस्थांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार मानले. एक सामाजिक बांधिलकी म्हणून दिव्यांग आणि अपंग बांधवांना हरप्रकारे मदत केली पाहिजे. विकलांग, दिव्यांग बांधवांच्या दुख:ावर फुंकर मारुन त्यांचे जीवन सुखकर करणे हे समाजातील प्रत्येक घटकाचे कर्तव्य आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर, एक माणून म्हणून दिव्यांग बांधवांना नेहमीच मदत करत राहणार असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.
दिव्यांग बांधवांच्या अडचणी दूर करणे हे आद्य कर्तव्य : आ. शिवेंद्रसिंहराजे
RELATED ARTICLES