म्हसवड : सुमारे दिडशे वर्षापुर्वी पासून कसत असलेल्या येथील शेतक-यांच्या कुळ हक्काच्या शेतजमिनी सरकारने संबधित शेतक-यांच्याच नावे करावी या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड परिसर जमिन हक्क आंदोलन कृती समितीची स्थापना करुन या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा तिव्र आंदोलने करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.डॉ.भारत पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे झालेल्या बैठकीस माजी नगराध्यक्ष विलासराव माने, नगरसेवक धनाजी माने,माजी नगरसेवक बाबुराव माने,दिलीप माने, बाळासो माने, विजय माने,धनाजी भोसले, सामाजिक कार्यकर्ते अजित केवटे मसु कलढोणे, राजेंद्र कोले,गणपत झगडे, मच्छिंद्र खरारे, दादा तांदळे,अशोक पोतदार,विठ्ठल राखुंडे,राजु केवटे, प्रकाश झगडे,इत्यादी प्रमुख शेतकरी उपस्थित होते.सुमारे एक हजाराहुन अधिक संख्येने असलेल्या येथील शेतक-यांच्या शेतजमिनीच्या सातबारा सदरी सुमारे 135 वर्षापुर्वी पासुन आज अखेक रेषेच्या वर राजे कुटुंबांची नावे व रेषेखाली जमिन कसत असलेल्या शेतक-यांची कुळ व इतर हक्क सदरी नावे नोंद आहेत.संबधित शेतक-यांना या जमिनीवर शेती साठी बँकेचे कर्ज मिळु शकत नाही. जमिन गहाण,तारण, व विक्रीचेही व्यवहार करता येत नाहीत.विक्रीसाठी शासनाची शासनाची परवानगी घ्यावी असे कायद्यात नमुद असतानाही संबंधित महसुल अधिकारी परवानगी देतच नाहीत.विशेष बाब म्हणजे सरकारने राज्यातील सर्व शेतक-यांचे सातबारा उतारे संगणिकरण करण्याचे आदेश दोन वर्षापुर्वी दिले आहेत व या आदेशानुसार राज्यामधील सर्व तालुक्यातील शेतक-यांचे सात-बारा उतारे संगणकियकरणाची कामे शंभर टक्कर पुर्ण झालीत असे असताना येथील मात्र सर्व कुळ धारक शेतक-यांचे सातबारा उतारे संगणकिय करण करण्याचे सरकार कडुन टाळण्यात आले आहे. अद्यापही संगणकिय सात-बारा उतारे नोंदी केलेलेच नाहीत.संगणकिय सातबारा उतारे नोंदविताना संबंधित तलाठ्यांना अडचणी येत असल्यामुळे नोंदी घेणेच प्रलंबित ठेवले असल्याचे महसुल अधिकारी सांगत आहेत.सातबारा उतारे संगणकिय करणानंतर शेतक-यांच्या जमिन खरेदी विक्री व्यवव्हार व वारस नोंदीही हस्त लिखित सात-बारा उता-यावर करण्यास बंदी घालुन इंटरनेट वरीलच संगणकिय उता-यावर या नोंदी करण्याचे आदेश सरकारकडुन जारी केले गेले आहेत. येथील शेतक-यांचे सात-बारा उता-यांचे अद्यापही संगणकिय करणच न केल्यामुळे वारस सह न्यायालयीन हुकुमनाम्याच्या नोंदीही दोन वर्षापासुन रेंगाळल्या आहेत.इत्यादी समस्याचे गा-याणे उपस्थित शेतक-यांनी डॉ.पाटणकर यांचे समोर मांडुन वर्षानुवर्षे सात-बारा सदरी बेकायदेशीर रित्या सरकारने रेषेच्यावर नोंदी करुन ठेवण्यात आलेली येथील राजे कुटुंबांची पोकळ स्वरुपाची नावे रद्द करुन आम्ही दिडशे वर्षापुर्वी पासुन कसत असलेल्या कुळांची नावे सातबारा सदरी मालकी हक्क म्हणजेच रेषेच्या वर तातडीने नोंद करावीत अशी मागणी या बैठकीतील शेतक-यांनी केली.सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास आम्ही बायकामुलांसह तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या संबंधित शेतक-यांनी केला. या पुढील सर्व आंदोलनाचे नेतृत्व डॉ.पाटणकर यांनीच करावे असा ठरावही या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.यावेळी विलासराव माने,अजित केवटे दिलीप माने,धनाजी माने आदींची भाषणे झाली व कुळ हक्काच्या जमिनी संबंधित शेतर-यांच्या नावे करण्यासाठी शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संकल्प जाहिर केला.या बैठकीस येथील केवटेमळा,शेरी, कलढोणे मळा, राऊतवाडी,राखुंडे वस्ती,राखुंडे मळा, धनगरमळा, झगडे मळा,मानेवस्ती इत्यादी भागातील कुळ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.म्हसवड येथील कुळ वहिवाटदार जमिनधारक शेतक-यांची मागणी रास्त असुन वर्षानुवर्षे कसत असलेल्या शेतक-यांच्या नावे जमिन करे सरकारने जाणीवपुर्वक टाळले आहे.या साठी म्हसवड परिसर जमिन हक्क आंदोलनच्या माध्यमाने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 26 तारखेस शेतकरी कुटुंबाचा मेळावा घेऊन आंदोलनाची दिशा ठरवली जाईल या मेळाव्यास सर्व शेतकरी बांधवांनी बायका मुलांसह उपस्थित राहावे -डॉ.भारत पाटेकर
कुळ हक्काच्या जमिनी शेतकर्यांना मिळण्यासाठी आंदोलनाचा इशारा
RELATED ARTICLES