म्हसवड ः दुष्काळी भागात पाणीबाणीची परिस्थिती गंभीर असून,दहा, बारा दिवसातून गावात टॅकर येतो,रोजगार उपलब्ध नसल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ येऊन स्थलांतर करत असून, शेतकर्याच्या बागा जाग्यावर जळाल्या असून पिक विमा उतरवला असूनही विम्याचा हप्ता मिळाला नाही.दुष्काळावर उपाययोजना करून मात करण्यासाठी मे महिन्यातही शासनाने दुष्काळ गांभिर्याने घेतला नसून शासन कासवगतीने काम करत आहे.दुष्काळ गंभीर असताना गांभिर्याने उपाययोजना करुन दुष्काळग्रस्ताना दिलासा द्यावा अन्यथा जनता माफ करणार नाही असा इशारा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला.
माण तालुक्यातील जनतेची पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी माणुसकीच्या नात्याने मदत करण्यासाठी बारामती अॅग्रो च्या वतीने माण तालुक्याला देण्यात आलेल्या 30 टॅकरचा शुभारंभ म्हसवड येथे शरद पवार यांचे शुभ हस्ते करण्यात आला,यावेळी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, संजय मामा शिंदे, प्रभाकर घार्गे, उपनगराध्यक्षा स्नेहल सुर्यवंशी,पृथ्वीराज राजेमाने, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना पवार म्हणाले सन 1972 मध्ये राज्यात मोठ्या दुष्काळ पडला होता. त्यावेळी मी मंत्री म्हणून काम करत होतो.त्यावेळी पाण्याची टंचाई अजिबात नव्हती, पाण्यासाठी ऐकही टॅकर द्यावा लागत नव्हता. मात्र या वेळचा दुष्काळ भिषण आहे.या वेळी लोकांची पिण्याच्या पाण्याची अवस्था दयनीय झाली आहे .जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर वर अवलंबून आहे. म्हणून प्रत्येक कुटुंबाला मोठी झळ सोसावी लागत आहे.
जनता दुष्काळी झळा सोसत असताना शासन गंभीर आहे असे दिसून येत नाही. कासवाच्या गतीने काम सुरू आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी च्या काळात ऑगस्टमध्ये शासन दुष्काळी उपाययोजना करत होते. यावेळी 13 मे उजाडला तरीही शासन गंभीर नाही. असा आरोप करुन पवार पुढे म्हणाले माण तालुक्यात 74 गावे 569 वाड्या 1लाख 36 हजार 272 लोकसंख्या व 61 हजार जनावरं पाण्यासाठी तडफडत आहेत. सध्या 103 टॅकरने पाणी पुरवठा केला जात आहे. या उपाययोजना नी माणच्या जनतेची तहान भागत नाही. जुन जुलै पर्यंत पाऊस पडत नाही. शासनाने ऑगस्ट पर्यंत तयारी दुष्काळी उपाययोजना देण्यासाठी तयारी ठेवावी,
हे संकट मोठं आहे,माणची जनता हवालदिल झाली असून तालुक्यातील लोकांशी चर्चा करून रोहितदादा पवार यांनी बारामती अॅग्रोच्या माध्यमातून 30 टॅकर देण्याची व्यवस्था केली आहे. आज 15 टॅकर दिले असून उर्वरित टॅकरही देण्यात येणार आहेत. पाण्याचे स्तोत्र शोधून अडचणीच्या गावांना दोन महिणे राजकारण न करता तहानलेल्या जनतेला पिण्याचे पाणी देऊन पुण्यकर्म करावे असे आवाहन पवार यांनी कार्यकर्त्यांना करून 23 मे नंतर मला संजयमामा यांच्या रूपाने केद्रात जोडीदार मिळणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
यावेळी प्रभाकर देशमुख, प्रभाकर घार्गे, रोहितदादा पवार यांनी मनोगत व्यक्त केलं,पवार साहेब यांचा सत्कार उपनगराध्यक्षा स्नेहल यांच्या हस्ते करण्यात आला. तर आभार माजी नगरसेवक युवराज सुर्यवंशी यांनी मानले.
दुष्काळग्रस्तांना दिलासा द्यावा अन्यथा जनता माफ करणार नाहीः शरद पवार
RELATED ARTICLES