सातारा : छत्रपती शिवराय यांची एकेकाळी राजधानी असलेल्या सातारा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे. परंतु, उमेदवार जाहीर करण्याबाबत पहिले तुम,, पहिले तुम,, धोरण निश्चित केल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.यामुळे अनेक इच्छुकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.
सातारा लोकसभा निवडणुकीत गेली दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खा. उदयनराजे भोसले यांनी विजयश्री खेचून आणली आहे. सध्या, राष्ट्रवादीने अद्याप त्यांची अधिकृत घोषणा केली नाही. भाजपचे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील,पुरुषोत्तम जाधव, विक्रम पावसकर, शिवसेनेचे नरेंद्र पाटील, रामभाऊ रैनाक, शारदा जाधव, राजेश कुंभारदरे, हणमंतराव चवरे व आरपीआय चे अशोक गायकवाड, अशोकराव मदने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान खा. उदयनराजे भोसले, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. सध्या सर्व इच्छुक मंडळी आपल्या समर्थकांची भेट घेत आहेत. काहींनी मेळावाच्या माध्यमातून आपली उमेदवारी कशी योग्य आहे?हे दाखविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याव्यतिरिक्त पक्षबदल करून ऐनवेळी एखादा पक्ष उमेदवार जाहीर करू शकतात.असेही वातावरण निर्माण झाले आहे. सातारा लोकसभेसाठी भारिप बहुजन महासंघाने लोहार समाज्यातील श्री एडगे यांची उमेदवारी जाहीर करून गाठी-भेटी सुरू केल्या आहेत.अशी माहिती गणेश भिसे यांनी दिली आहे. तर सातार्यातील काहीं स्वयं घोषित गडयानी आपले नाव चर्चेत आले पाहिजे यासाठी उमेदवारी घोषित केली आहे. परंतु, यंदा प्रमुख राजकीय पक्षांतच चुरशीची निवडणूक असल्याने उमेदवारी जाहीर करण्यात थोडा वेळ लागेल अशी माहिती सर्वच राजकीय पक्ष देऊ लागले आहेत.
सातारा लोकसभा मतदारसंघात जावळी-सातारा, पाटण, कराड(दक्षिण),कराड(उत्तर),वाई-महाबळेश्वर-खंडाळा,, कोरेगाव हे विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.सुमारे पावणे आठ लाख मतदार आहेत.मतदार यादी, मतदान केंद्र,आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
सातार्यात उमेदवारी जाहीर करण्यास राजकीय पक्षांचे पहिले तुम, पहिले तुम धोरण
RELATED ARTICLES