सातारा : ईव्हीएम मशीनद्वारे निवडणुका घेऊ नयेत ही आग्रही भूमिका घेत ममशीन नको, बलेट पेपर हवाफ आसा आक्रमक पवित्रा वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा डॉ. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकरांनी घेतलाय. निवडणूक आयोगाकडेही त्यांनी याबाबत रेटा लावलाय. त्यामुळे राज्यात आणि देशात ईव्हीएम मशीन विरोधात वातावरण तयार होऊ लागलंय. महाराष्ट्रात मात्र यासंबंधी धाडसाने कोणता पक्ष अथवा नेता आक्रमक होताना दिसत नाही, अशा स्थितीत सातारचे खासदार मा. उदयनराजे भोसले यांनी जाहीरपणे ईव्हीएम च्या विरोधात भूमिका घेऊन अप्रत्यक्षपणे वंचितच्या लढाईत सहभाग दर्शवलाय, ही बाब स्वागतार्ह आहे, असे मत वंचितचे समन्वयक चंद्रकांत खंडाईत यांनी पत्रकार परिषदेत नोंदवले. सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदार संघात ताकदीचे उमेदवार देऊन वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढवणार असल्याचेही खंडाईत यांनी यावेळी सांगितले.
वंचित बहुजन आघाडी व खासदार उदयनराजे भोसले यांच्यामध्ये वैचारिक मतभेद जरुर आहेत. ते राहतील सुद्धा. तथापि, देशहितासाठी, लोकशाही बळकटीसाठी जर खासदार उदयनराजे भोसले हे ईव्हीएम नको, बलेट पेपर हवा ही वंचितची भूमिका उचलून धरत असतील तर त्यांना मनापासून धन्यवाद देणं आमचे नैतिक कर्तव्य आहे, असे स्पष्ट करून चंद्रकांत खंडाईत पुढे म्हणाले, ईव्हीएम हटावच्या मागणीसाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याची गरज नाही. उलट त्यांनी हा विषय सभागृहात लाऊन धरावा. जोपर्यंत ईव्हीएम हटावाच्यादृष्टीने सभागृहात चर्चा होत नाही, तोपर्यंत मी सभागृहातून बाहेर पडणार नाही, असा पवित्रा घ्यावा. त्याचबरोबर मुंबईत अधिवेशन सूरु आहे, तेथे जाऊन आंदोलनात्मक एल्गार छेडावा. यापूर्वी वंचित आघाडीने एकाचवेळी राज्यभर घंटानाद आंदोलन करून सरकारच्या कानठिळ्या बसविल्या आहेत. निवडणूक आयोगालाही धारेवर धरले आहे. लवकरच दिल्लीत बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडून सरकारला ईव्हीएमबाबत फेरविचार करावयास भाग पाडणार असल्याचेही खंडाईत यांनी म्हटले.
लोकसभा निवडणुकीत सातार्यात वंचितने लाखाच्या पटीत मते घेतलीत. परंतु मशीनने आमच्यासमोर 40 हजाराचा आकडा ठेवलाय. वोट बँक असणारा ओबीसी, मुस्लिम अशा सर्व समाजसमुहातील मतदार हा वंचितसोबत होता. असे असताना केवळ ईव्हीएम मशीनने काही हजारावरच आम्हाला थोपवलंय, हे न पटण्याजोगे असून मशीनद्वारे घडबड घोटाळा केला जातोय, या शंकेला याप्रकाराने पूष्टी मिळालीय. तेव्हा आता आम्हाला कोणत्याही परिस्थितीत ईव्हीएम मशीन नकोय, बलेट पेपर हवाय हा नारा बुलंद करायचा आहे. यासाठी पुरोगामी विचाराचे जे जे समविचारी पक्ष, नेते, संघटना, आमच्यासोबत येतील त्यांचे स्वागतच राहणार आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. याकडे कोणीही लक्ष द्यायाला तयार नाही. एकूणच जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला कोणी वाली नाही अशी आवस्था झाली आहे. याबाबत अनेकवेळा जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदने दिली, मात्र काहीही परिणाम झालेला नाही. खरंतर, पालकमत्र्यांसह जिल्ह्यातील खासदार, आमदार व प्रशासकीय अधिकारी यांच्या अनेक विषयावर मिटींग होतात. परंतु सर्वसामान्य, गोरगरीब जनतेच्या आरोग्याशी खेळ चालवलेल्या आरोग्य व्यवस्थेबद्दल कोणीही काही गांभीर्याने बोलताना दिसत नाही. परिणामी आजारपणातून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. सिव्हिलमध्ये ही सुविधा नाही, तज्ज्ञ डॉक्टर नाही असे सांगून पेशंटला दुसर्या खासगी हॉस्पिटलला पिटाळून त्याच्याकडून पैसा उकळण्याचा प्रयत्न राजरोसपणे होताना दिसतोय. खरंतर, ही बाब चिंतेची असून याचा परिणाम आजारपणातून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढीवर झालाय. शासनाने याबाबत तातडीने लक्ष घालावे. जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचा आढावा घ्यावा. गोरगरीब जनतेला खात्रीपूर्ण, शास्वत चांगली आरोग्य सेवा कशी मिळेल यासाठी प्रयत्नशील रहावे. कोणाच्याही आरोग्याशी खेळू नये, अन्यथा जिल्हाभर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही चंद्रकांत खंडाईत यांनी या पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक बाळकृष्ण देसाई, हरिदास जाधव, भरत लोकरे सर, मच्छिंद्रनाथ जाधव, सुरेश बोतालजी संजय भालेराव, प्रसाद गुडीले सुधाकर काकडे,आदी उपस्थित होते.
ईव्हीएम नको, बँलेट पेपर हवा; खा. उदयनराजेंच्या भूमिकेचे स्वागत
RELATED ARTICLES