Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीजलयुक्त शिवार अभियानासाठी यावर्षी 210 गावांची निवड

जलयुक्त शिवार अभियानासाठी यावर्षी 210 गावांची निवड

4 हजार 519 कामे प्रस्तावित, 163 कोटी 32 लाखांचा आराखडा तयार
सातारा(एकनाथ थोरात यांजकडून) : सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यामधील 210 गावांची जलयुक्त शिवार अभियान 2017-18 साठी निवड झाली असून 4 हजार 519 प्रस्तावित कामे 12400.30 हेक्टर क्षेत्रावर होणार असून त्यासाठी 163 कोटी 32 लाख 70 हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा जिल्हास्तरीय जलयुक्त शिवार अभियान समितीचे सचिव राजेंद्र साबळे व कृषि संचालक जे. बी. काळे यांनी दिली आहे.
टंचाईमुक्त (टँकरमुक्त) करावयाच्या गावामध्ये सातारा तालुक्यातात निवड झालेल्या 17 गावात 151 कामे प्रस्तावित असून 489.25 हेक्टर क्षेत्रावर 491.12 लाखाचा आराखडा निश्‍चित झाला आहे. कोरेगाव तालुक्यात 30 गावात 668 कामे 1461 हेक्टर होणार असून त्यासाठी 2105.09 लाख रुपयांचा आराखडा तयार केला आहे. खटाव तालुक्यातील 42 गावांची निवड झाली असून 1161 प्रस्तावित कामे 4553.30 हेक्टर क्षेत्रावर होणार आहेत. त्यासाठी 3468.95 लाखाचा आराखडा तयार केला आहे. फलटण तालुक्यात 19 गावांची निवड झाली असून 315 कामे 668.35 हेक्टर क्षेत्रावर होणार असून 701.03 लाखाचा आराखडा तयार केला आहे. माण तालुक्यातील 36 गावांची निवड झाली असून 888 कामे 2536 हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित आहेत. त्यासाठी 5907.75 लाखाचा आराखडा तयार केला आहे. कराड तालुक्यातील 21 गावांची निवड झाली असून 654 कामे 815 हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित आहेत. त्यासाठी 1615.04 लाख रुपयाचा आराखडा तयार केला आहे. पाटण तालुक्यात 19 गावांची निवड झाली असून 229 कामे 309.5 हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित आहेत. यासाठी 724.65 लाख रुपये आराखडा केला आहे. जावली तालुक्यातील 15 गावांसाठी 243 कामे 592 हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित 693.32 लाखाचा आराखडा तयार केला आहे. खंडाळा तालुक्यातील 4 गावांची निवड केली असून 74 कामे 783.90 हेक्टर क्षेत्रावर होणार आहे. त्यासाठी 177.68 लाख खर्च आराखड्यात दाखवला आहे. वाई तालुक्यातील 4 गावांची निवड झाली असून 105 कामे 172 हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित आहेत, त्यासाठी 340.42 लाखाचा आराखडा निश्‍चित केला आहे. महाबळेश्‍वर तालुक्यात 3 गावांची निवड झाली असून 31 कामे 20 हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित आहेत, त्यासाठी 107.65 लाखाचा आराखडा तयार केला आहे. या प्रमाणे जलयुक्त शिवार अभियान 2017-18 अंतर्गत जिल्ह्यातील 210 गावाची निवड होवून आराखडा तयार केला असुन तो अंतीम मंजूरीसाठी विभागीय कृषि आयुक्तालयामध्ये पाठवविण्यात आला आहे. अस्तित्वात, मंजूर कामे नव्याने हाती घ्यावयाची कामे, अस्तित्वातील जलस्त्रोतांची दुरुस्ती व बळकटीकरण करणे, गाळ काढणे, अशी विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत. राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभिायान सन 2014-15 पासून सुरु केले. पहिल्या वर्षी जिल्ह्यात 215 गावांची निवड जाली होती. दुसर्‍या वर्षी 210 गावाची निवड झाली असून आत्तापर्यंत 425 गावामध्ये गाळमुक्त शिवार योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. जिल्ह्याची हळू हळू टँकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular