सातारा : सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील दिव्यांग, विधवा, निराधार अशा दिड हजार लाभार्थी गेली चार महिने अनुदान देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांची उपासमारी होत असून शासकीय पातळीवर फक्त कोरोनाचे बोला असे सांगतात. या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांनी दिली आहे.
कोरोना पाश्वभूमीवर देशभर लॉक डाउन झाले होते. सर्व यंत्रणेला वेतन देण्यात आले पण, शारीरिक अपंगत्व आलेल्या दिव्यांग काम करू शकत नाहीत. त्यांना उपजीविकेचे साधन नाही. अनुदानापासून वंचीत राहिले आहेत. दर महिन्याला प्रत्येकी एक हजार व केंद्र सरकारने एक हजार असे चार महिने अनुदान देण्यात आले नाही. याची माहिती सर्वाना देण्यात आली आहे. पण, फारसे कोणी लक्ष दिले नाही. आमचे नेते राज्यमंत्री ओमप्रकाश तथा बच्चू कडू यांच्या पाठपुराव्याने दिव्यांग यांना न्याय मिळवून दिला आहे. त्याचे सर्व राज्यातील दिव्यांग ऋणी आहेत.
सातारा तालुक्यातील दिव्यांग यांच्यासाठी अद्याप अनुदान आले नाही असे सांगतात पण, सातारा तहसीलदार कार्यालयातून वेळेत कोषागार कार्यालयात बिल पाठविण्यात आले नाही. त्यामुळे विलंब होत आहे. सदर बिल तयार करण्याचे काम का रखडले याची चौकशी करून शासकीय पातळीवर कामात कुचराई केली म्हणून संबधीत अधिकारी,लिपिक यांची विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे.
सदर विलंबानंतर राज्यातील वित्त विभागाने निधी खर्च करण्याचे थांबविले असून त्याचा फटका सातारा तालुक्यातील गरीब निराधार, विधवा, दिव्यांग यांना बसला आहे. असा आरोप करण्यात आला आहे.
सातारा कोषागार कार्यालयात सानुग्रह अनुदान मागणीचे पत्र सातारा तहसीलदार कार्यालयातून केव्हा पाठविले? शासनाच्या वित्त विभागाने निधी वितरित करू नये असा आदेश दि ५ मे २०२० रोजी काढे पर्यंत वाट का पहिली? याचे उत्तर दिव्यांगाचे आश्रयदाते राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सातारा तहसील कार्यालयात विचारावे अशी विनंती करण्यात आली आहे.
सातारा तालुक्यातील ग्रामीण भागात केंद्र व राज्य सरकारच्या वतीने संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, देवदासी लाभार्थी, इंदिरा गांधी
वृद्धापकाळ,विधवा-विकलांग लाभार्थी यांना अनुदान वेळेत देण्यासाठी टाळाटाळ केली जात असेल तर कृतिशील शासन,,महाराष्ट्र शासन,,,या शब्दावर गरीब जनता कसा विश्वास ठेवणार? असा मार्मिक प्रश्न साताऱ्यातील प्रज्ञा सामाजिक शिक्षण संस्थचे अध्यक्ष मधुकर आठवले,शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील, पँथर नेते अशोक भोसले, बाळासाहेब शिंदे, महारुद्र तिकुंडे यांनी करून दिव्यांग आंदोलनाला जाहीर पाठींबा दिला आहे.
चार महिने दिव्यांगांना अनुदान नसल्याने उपासमारीची वेळ
RELATED ARTICLES