पाटण:- लॉकडाऊन मध्ये सर्व स्तरातील व्यवहार ठप्प झाले आहेत. जगाचा पोशिंदा शेतकरी मात्र यामध्ये सर्वांच्या हाकेला खंबीर उभा आहे. या काळात अनेक शेतकऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. अशात डगमगेन न जाता पाटण तालुक्यातील किल्ले मोरगिरी येथील शेतकरी अशोक अवघडे यांनी आपल्या शेतात पिकलेला २ टन भाजीपाला परिसरातील गोरगरिब जनतेसह कोरोनाच्या युध्दात २४ तास तत्पर असलेले पोलीस जवान, महसूल विभागाचे कर्मचारी, आरोग्य रक्षकांना मोफत देऊन समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
किल्ले मोरगिरी मधील अशोक अवघडे हे मुंबई येथे स्वत: च्या व्यावसायाच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत. परंतू गेल्या तीन ते चार वर्षात त्यांनी आपल्या गावानजीक शेत जमिन घेऊन त्यामद्ये शेतमाल पिकवण्यास सुरवात केली. सध्या लॉकडाऊन मुळे अनेक व्यवसाय अत्यंत अडचणीत आलेले आहेत. जगाचा पोशिंदा शेतकरी मात्र सर्वांच्यासाठी कंबर कसून उभा आहे. परंतू काही ठिकाणी हवालदिन होऊन अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमाला वरती ट्रक्टर, जै.सी.बी फिरवून शेतमाल उद्धवस्त केलेले सोशल मीडियावरील व्हिडिओ, टिव्ही व व्रुत्तपत्राच्या बातम्यांमधून पाहत आहोत.
परंतू किल्ले मोरगिरी येथील अशोक अवघडे या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील २ टन भाजीपाल्यासह वांगी, टोमॅटो, काकडी, डब्बू मिरची, दोडका आदी शेतमाल काढून तो गोरगरीब व काही गरजू लोकांना वितरीत केला. हे वितरण करताना कसलाही गाजावाजा नाही कि कोणतीही जाहिरात बाजी नाही. अशोक अवघडे यांनी आपण स्वत: त्या त्या ठिकाणी जाऊन लोकांना भाजीपाल्याचे मोफत वाटप केले. त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले, सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वजन हतबल आहेत . मात्र शेतमाल उद्धवस्त करण्यापेक्षा एखाद्या भूकेलेच्या मुखी गेलातर त्याही पेक्षा दुसरे भाग्य नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये “जित जाएंगे हम लेकिन साथ अगर सब हो।” असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या उपक्रमाचे पाटण तालुक्यातील जनता तोंडभरुन कौतुक करत आहेत. अशोक अवघडे या शेतकऱ्यांचा आदर्श ईतर शेतकऱ्यांनी घेऊन शेतातील शेतमाल मात्र न करता गोरगरिबांच्या मुखात घालावा असे अनेकांनी आवर्जून सांगितले.
कमाई नको पण भूकेलेंच्या तोंडचा घास होऊयात ; किल्ले मोरगिरी च्या शेतकऱ्याची लॉकडाउन मध्ये गोरगरिबांना २ टन भाजी मोफत
RELATED ARTICLES