सातारा: वाचाल तर वाचाल या न्यायाने मानवाने ग्रंथालयाशी मैत्री करावी. ग्रंथसंपदा वाढविणे व संवर्धन करणे काळाची गरज आहे,असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले.
येथील पाठक हॉलमध्ये प्रतापसिह महाराज जयंतीनिमित्त अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय यांच्यावतीने श्रीमंत प्रतापसिह महाराज(थोरले) स्मृतीप्रित्यर्थ ग्रंथालय पुरस्कार वितरण युवराज पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तेव्हा ते मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी अश्वमेधचे संस्थापक डॉ.रवींद्र भारती -झुटिंग होते.यावेळी अधिकारी,पदाधिकारी व ग्रंथालय चळवळीतील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. पाटील पुढे म्हणाले, ग्रंथालयातील कार्यकर्त्यांनी साहित्य चळवळीशी निगडित रहावे. ग्रंथालयबाबत ऐतिहासिक पार्श्वभूमी पाटील यांनी उदाहरणे देऊन सांगितली.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे म्हणाले,अश्वमेधचा स्तुत्य असा उपक्रम आहे. ग्रंथालय कर्मचारी यांना कमी मानधणामध्ये काम करावे लागत आहे.खरोखरच संक्रमणाचा काळ असून सुमारे 5 वर्षांमध्ये तर दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे.
मनोगतामध्ये संजय इंगवले यांनी श्रीमंत पाटणकर वाचनालयाचा अमृतमहोत्सव साजरा झाला आहे.मी वाटाड्याचे काम वाचकांपर्यंत प्रामाणिक केले आहे.असे सांगून मिळालेला पुरस्कार ग्रंथालय चळवळीशी निगडित असणार्या कार्यकर्त्याना समर्पित करीत असल्याचे नमूद केले. याशिवाय,प्रा.श्रीधर साळुंखे, पार्टे व नंदाताई जाधव यांनीही अभ्यासपूर्ण असे मनोगत व्यक्त केले.
उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार – विद्यावर्धिनी सार्वजनिक ग्रामवाचनालाय(जकातवाडी), उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरसाकार – नंदाताई जाधव (सातारा), उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार – संजय इंगवले (पाटण) व उत्कृष्ट ग्रंथ वाचक पुरस्कार – प्रा.श्रीधर साळुंखे(सातारा) यांना पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सदरच्या कार्यक्रमास कोयना शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी अमरसिह पाटणकर, प्रा.बी एन पाटील, नागोजीराव पाटणकर वाचनालयाचे अध्यक् विलासराव क्षीरसागर, उपाध्यक्ष श्रीकांत फुटाणे, कार्यवाह चंद्रहार निकम,संचालक राजेश पवार, दत्तात्रय कवडे, मल्हारपेठ वाचनालयाचे ग्रंथपाल दादासाहेब पवार, त्रिपुडी येथील पाटणकर वाचनालयाचे संचालक अनिल वीर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
सूत्रसनाचालन व आभारप्रदर्शन वैद्यही कुलकर्णी यांनी केले.
ग्रंथसंपदा वाढविणे व संवर्धन करणे गरजेचे: पाटील
RELATED ARTICLES