मसूर : सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचा सन 2018-19 हा 45 वा गळीत हंगाम अंतिम टप्प्यावर आला असून, ऊसाने भरलेली वाहने गुलालाची उधळण आणि ढोल ताशांसह मिरवणूकीने गाळपासाठी कारखान्याकडे दाखल होताना दिसत आहेत.
कारखान्याने यंदाच्या हंगामात आजअखेर 172 दिवसांत 13,16,500 मे.टनाचे गाळप करून 16,44,725 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सरासरी 12.38 टक्केच्या दरम्यान साखर उतारा मिळाला आहे. कारखान्याप्रती सभासदांचा असलेला विश्वास आणि कारखान्याने त्या विश्वासास पात्र राहून कांही हंगामाचा अपवाद वगळता प्रत्येक हंगामात दिलेल्या उच्चांकी दरामुळे कारखान्यास ऊसाची उपलब्धता चांगली राहिली.
राज्य व केंद्र शासनाचे सहकारी साखर कारखानदारीबद्दल सकारात्मक धोरण नसल्याने राज्यातील अनेक कारखाने कमी गाळप करून बंद पडले तर काहंीनी आपला हंगाम आटोपता घेतला. मात्र सह्याद्रि कारखान्याचे चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने कार्यक्षेत्रातील कारखान्याकडे नोंदविलेला व बिगर नोंदविलेला गाळपास योग्य असा ऊस शिल्लक राहू नये, यासाठी खबरदारी घेतलेली असून या सर्व कामकाजावर कारखान्याचे चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील जातीने लक्ष देवून आहेत. गाळपाविना ऊस शेतात शिल्लक राहू नये यासाठी विशेष काळजी घेतली आहे. एकूण हंगाम अंतिम टप्प्यावर असून, वाजत गाजत ऊस वाहने कारखाना कार्यस्थळावर दाखल होत आहेत.
सह्याद्रिचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यावर
RELATED ARTICLES