साताराः पर्यावरणपूरक गणेशविसर्जनाबाबत उच्च न्यायालयाने चार वर्षापूर्वी आदेश दिले होते परंतु जिल्हाधिकार्यांना त्याबाबत ठोस कार्यवाही करता आलेली नाही. चार वर्षे ते काय झोपले होते का ? चार वर्षात गणेशविसर्जनासाठी कायमस्वरुपी तळे उभारून झाले असते परंतु हे करण्यात सातारा नगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे आता निर्माण झालेल्या परिस्थितीला जिल्हाधिकारी आणि नगराध्यक्षा जबाबदार आहेत. त्यांना कामे जमत नसेल तर त्यांनी पदाचे राजीनामे द्यावेत. उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई देण्याची तयारी सुरु केली आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
याबाबत केंद्रीय आणि राज्य पर्यावरणमंत्री, नगरविकास सचिव यांना श्री. मोरे यांनी निवेदन पाठवले असून त्यात उच्च न्यायालयाने चार वर्षापूर्वी सातारा जिल्हाधिका-यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत आदेश दिले होते. विसर्जनामुळे नैसर्गिक स्त्रोत खराब होऊ नयेत. कशाप्रकारे विसर्जन करावे यासाठी ठोस निर्णय घ्यावेत असे सांगितले होते. परंतु चार वर्षात काहीच झाले नसल्याने चार वर्षे जिल्हाधिकारी झोपले होते का ? असा सवाल श्री. मोरे यांनी केला आहे. एकीकडे पाण्याचे स्त्रोत वाचवण्यासाठी ठिकठिकाणी तळे बांधायची, बंधारे बांधले जात आहेत. पाणी आडवा, पाणी वाचवण्याचे संदेश शासनाकडे देण्यात येत आहे. त्यासाठी योजना राबवल्या जात आहेत. सातार्यात मात्र जलस्त्रोत वाचवण्याऐवजी ते कसे दूषित होतील यासाठी जिल्हाधिकारी उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेत आहेत. जिल्हाधिकार्यांनी अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह भूमिका घेतलेली आहे. जिल्हाधिकार्यांच्या या भूमिकेविरोधात लढा देण्याची माझी तयारी आहे. एकीकडे शासन पर्यावरणपूरक निर्णय घेत आहे. प्लॉस्टिकबंदी सारखा निर्णय घेतला गेला आणि दुसरीकडे जिल्हाधिकारी हया पर्यावरणाविरोधात भूमिका घेत आहेत. जिल्हाधिका-यांनी नेमून दिलेले काम प्रामाणिकपणे करावे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव व्हावा यासाठी जिल्हाधिकार्यांनी प्रयत्न करावेत. परंतु पर्यावरणाची हानी झाली, जलस्त्रोताचे नुकसान झाले तर त्यांच्याविरोधात कायदेशीर लढाई लढण्यास मी तयार आहे. जिल्हाधिकार्यांनी सातार्यात आल्यानंतर आपल्याबद्दल काय काय चर्चा आहे याचाही कानोसाही त्यांनी घ्यावा. जिल्हाधिकार्यांच्या या कारभाराविरोधात सामान्य सातारकरांना घेऊन लवकरच पर्दाफाश करणार आहे. सातारच्या नगराध्यक्षांना कार्यभार स्वीकारून पावणे दोन वर्षे झाली. त्यांच्या कार्यकालातील हा दुसरा गणेशोत्सव आहे. पावणे दोन वर्षात त्यांना गणेश विसर्जनाची तयारी करता आलेली नाही, याच्यासारखे दुर्देव नाही. गणेशोत्सवासंदर्भातील बैठका घेण्यासाठी मला उपनगराध्यक्षांना निवेदन द्यावे लागते. पावणे दोन वर्षानंतर तरी नगराध्यक्षांनी आपली कार्यपध्दती बदलावी. केबिनमध्ये बसून कोणी सोम्या, गोम्या सांगेल त्याला मान हालवून होकार देऊ नये. गणेशमूर्तींची उंचीबाबात तसेच शाडूच्या मूर्ती वापरल्या जाव्यात यासाठी नगराध्यक्षांनी कोणत्याही बैठका घेतल्या नसून याबाबतही जनजागृती करण्यात नगराध्यक्षांना अपयश आल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
कृत्रिम तळे उभारण्यात अपयश ; अकार्यक्षम जिल्हाधिकारी, नगराध्यक्षांनी राजीनामे द्यावेत ; कायदेशीर लढाईला सज्ज :- सुशांत मोरे
RELATED ARTICLES