- साताराः पुणे बेंगलोर महामार्ग सातारा नजीक गौरीशंकर नॉलेज सिटी लिंब जवळ 90 लाख रुपये खर्चून उभारण्यात येत असलेला स्कायवॉकचे काम आता अंतिम टप्यात आले आहे. येत्या 15 दिवसात या स्कायवॉकचे काम पूर्ण होईल अशी माहीती महामार्ग प्रशासनाकडून देण्यात येत आहे. निधी अभावी हे काम रेगाळले होते. यामुळे गौरीशंकर नॉलेज सिटीच्या शैक्षणिक संकुलामध्ये ज्ञान घेणार्या हजारो विद्यार्थ्याच्या सुरक्षितेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत विविध वृत्तपत्रानी रेगाळलेल्या स्कायवॉकचे काम तातडीने सुरु व्हावे याबाबतचे वृत ही प्रसिध्द करुन प्रशासनाच्या लक्ष वेधले होते. अखेर प्रशासनाने या वृत्ताची गंभीर दखल घेत स्कायवॉकचे काम सुरु केले आहे. सुरु झालेल्या स्कायवॉकच्या कामामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुरक्षित ये जा करणे सोयीचे होणार आहे. यामुळे विद्यार्थी, पालक व संस्थेच्या प्रशासन मंडळाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थी महामार्गावरुन रस्ता ओलाडताना दिसून येतात. यामुळे अपघात घडण्याची शकता अधिक असते. अपघात व दुर्देवी घटना घडू नये यासाठी स्कायवॉक निर्मिती करण्यात आलेली आहे. स्कायवॉकचे काम पुन्हा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांचा प्रवास आता सुखकर होण्यास मदत होणार आहे.
महामार्गवरील गौरीशंकर स्कायवॉकचे काम अंतिम टप्यात
RELATED ARTICLES